आयपीएलची आजपासून ऑनलाईन तिकीटविक्री

  46

मुंबई :इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम असून त्यासाठी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनाच प्रतिक्षा असणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) खेळवला जाणार आहे. दरम्यान, आता बऱ्याच ठिकाणच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. चेन्नईमध्ये जाऊन स्टेडियममधून ज्यांना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १९ मार्च २०२५ पासून ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी १०.१५ वाजल्यापासून www.chennaisuperkings.com यावर तिकीट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सच्या वेबसाईटवर साईन अप करून त्यांच्या क्विज कॉन्टेस्टमध्ये जिंकून तिकीट मिळवण्याचीही संधी चाहत्यांना आहे. १७००, २५००, ३५००, ४००० आणि ७५०० अशा किंमतीची तिकीटे उपलब्ध असणार आहेत.
Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे