बीसीसीआयच्या नियमावर कपिल देवची ‘बोलंदाजी'

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट खेळाडूंसदर्भात बीसीसीआयने लागू केलेल्या नव्या नियमातील फॅमिलीसंदर्भातील मुद्दा अजूनही गाजतोय. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी विराट कोहलीनंही कुटुंबियांसंदर्भातील नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या या चर्चित आणि कठोर नियमाबद्दल भारताचे माजी क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी आपले मत मांडले आहे. दिग्गज क्रिकेटरने विराट कोहलीच्या सुरात सूर मिसळला असला तरी फॅमिली आणि प्रोफेशन यात योग्य समतोल साधणे गरजेचे आहे, या गोष्टीवरही जोर दिला आहे.



मंगळवारी पत्रकार परिषदेत संवाद साधताना कपिल देव यांनी बीसीसीआयच्या कुटुंबियांला दौऱ्यावर नेण्यासंदर्भातील नियमावर भाष्य केले. ते म्हणाले आहेत की, हा क्रिकेट बोर्डाचा निर्णय आहे. जर मला विचाराल तर हो.. खेळाडूंसाठी फॅमिली सोबत असणे गरजेची आहे. पण त्या खेळाडूनं टीमची साथ देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आमच्या काळात बोर्डाने सांगण्याआधी आम्ही पहिल्या हाफमध्ये खेळावर फोकस करायचो. दुसऱ्या हाफमध्ये कुटुंबियातील मंडळींनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी बोलवायचो, असा दाखला देत कुटुंबियांना दौऱ्यावर नेत असताना समतोल साधणं गजरेजे आहे, अशा आशयाचे वक्तव्य कपिल देव यांनी केले आहे.



विराट कोहलीने व्यक्त केली होती नाराजी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका खास कार्यक्रमात विराट कोहलीनं अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्याने बीसीसीआयने फॅमिलीसंदर्भात लागू केलेल्या नियमावर नाराजी बोलून दाखवली होती. कुटुंबियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते ते लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे. त्याचे फायदे लोकांना समजत नाहीत, अशा शब्दांत त्याने बीसीसीआयच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, भारतीय संघाचा दौरा जर ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तरच खेळाडूंना १४ दिवस फॅमिलीला सोबत नेता येईल. त्यापेक्षा कमी दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंना कुटुंबियातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळाडूंना या नियमाचे पालन करावे लागले होते.

Comments
Add Comment

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी