आयपीएलच्या ‘भागिदारी’त कोहलीचाच ‘विराट’ सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजांची भागीदारी महत्त्वाची असते. भागीदारीमुळेच संघ मोठा खेळ करू शकतो. जेव्हा मोठी भागीदारी होते तेव्हा गोलंदाजी संघावर दबाव वाढतो. आयपीएलही याला अपवाद नाही. आयपीएलच्या इतिहासात अशा टॉप-५ जोड्या आहेत ज्यांनी मिळून हजारो धावा केल्या आहेत, पण यंदा एकही जोडी पुन्हा मैदानावर दिसणार नाही. पण त्यांची कामगिरी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये कोरल्या गेल्या आहेत.



१. कोहली-डिव्हिलियर्स : ३१२३ धावा
आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा जोडण्याचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये ही जोडी शेवटची एकत्र खेळली होती. ७६ डावांमध्ये विराट आणि डिविलियर्स यांनी ४४ च्या सरासरीने ३१२३ धावा जोडल्या आहेत. त्यांची सर्वात मोठी भागीदारी २२९ धावांची आहे.



२. कोहली-गेल : २७८७ धावा
२०११ ते २०१७ या कालावधीत विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची जोडी आयपीएलमध्ये चमकदार ठरली. केवळ ५९ डावांमध्ये या दोघांनी ५२.५८ च्या सरासरीने २७८७ धावा केल्या. या जोडीने २०४ धावांची नाबाद भागीदारी देखील केली आहे, जी आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदाऱ्यांपैकी एक आहे. मात्र, त्यांच्या दमदार कामगिरीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.



३. धवन-वॉर्नर : २३५७ धावा
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या डावखुऱ्या जोडीने २०१४ ते २०१७ पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळले. या काळात, संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपदही पटकाले. धवन आणि वॉर्नर यांनी ५० डावांमध्ये एकत्र फलंदाजी केली आणि ४८ च्या सरासरीने २३५७ धावा केल्या.

४. कोहली-फाफ डू प्लेसिस : २०३२ धावा
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी आता तुटली आहे. द. आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिस नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. २०२२ मध्ये, तो आरसीबीचा भाग झाला आणि विराटसोबत डावाची सुरुवात करायचा. या जोडीने ४१ डावांमध्ये सुमारे ५० च्या सरासरीने २०३२ धावा जोडल्या.

५. गंभीर-उथप्पा : १९०६ धावा
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा ही जोडी टॉप-५ आहे. पण हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. २०१४ मध्ये, या जोडीमुळे केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. २०१४ ते २०१७ या कालावधीत गंभीर आणि उथप्पा यांनी ४८ डावांमध्ये एकत्र बॅटिंग केली. या दरम्यान त्यांनी ४० च्या सरासरीने आणि ५ शतकी भागीदाऱ्या रचल्या. तर या जोडीने एकूण १९०६ धावा जोडल्या.
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए