Eknath Shinde : संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसा आणि जाळपोळ झाली. विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन हल्ले सुरू होते. पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.



'आधी नागपूरमध्ये आंदोलन झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. आंदोलक शांततेने निघून गेले. नंतर संध्याकाळी आठ वाजता एक दुसराच गट रस्त्यावर आला. थोड्याच वेळात सुमारे पाच हजारांचा जमाव रस्त्यावर आला होता. महाल परिसर, मोमिनपुरा, हंसापुरी या भागात जमाव रस्त्यावर होता. मी टीव्हीवर महिलांच्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे- मोठे दगड टाकले. पाच वर्षाचा बच्चू मरता मरता वाचला, हॉस्पिटलमध्ये असलेले देवांचे फोटो जाळले... तुम्ही आंदोलन करा पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, कायदा हातात घेत विशिष्ट समुदयाला लक्ष्य करता... संध्याकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी जखमी झाले. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने वार झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. कार आणि दुचाकी पेटवण्यात आल्या. एका विशिष्ट ठिकाणी रोज १०० ते १५० गाड्या पार्क व्हायच्या तिथे एकही गाडी नव्हती, अशी मला मिळालेली माहिती आहे. याचा अर्थ जाणीवपूर्व हे षडयंत्र करत विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला.



दंगल करणाऱ्यांनी पोलीस येईपर्यंत धुमाकूळ घातला. पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक केली. पेट्रोल बॉम्ब टाकले. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दंगल करणाऱ्यांवर सरकार कायद्यानुसार कठोर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,