Eknath Shinde : संध्याकाळी ठरवून दंगल झाली ? एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसा आणि जाळपोळ झाली. विशिष्ट समाजाला लक्ष्य करुन हल्ले सुरू होते. पोलिसांवरही दंगलखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.



'आधी नागपूरमध्ये आंदोलन झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. आंदोलक शांततेने निघून गेले. नंतर संध्याकाळी आठ वाजता एक दुसराच गट रस्त्यावर आला. थोड्याच वेळात सुमारे पाच हजारांचा जमाव रस्त्यावर आला होता. महाल परिसर, मोमिनपुरा, हंसापुरी या भागात जमाव रस्त्यावर होता. मी टीव्हीवर महिलांच्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे- मोठे दगड टाकले. पाच वर्षाचा बच्चू मरता मरता वाचला, हॉस्पिटलमध्ये असलेले देवांचे फोटो जाळले... तुम्ही आंदोलन करा पण लोकशाही पद्धतीने आंदोलन करा, कायदा हातात घेत विशिष्ट समुदयाला लक्ष्य करता... संध्याकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये तीन डीसीपी जखमी झाले. एका डीसीपीवर कुऱ्हाडीने वार झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. कार आणि दुचाकी पेटवण्यात आल्या. एका विशिष्ट ठिकाणी रोज १०० ते १५० गाड्या पार्क व्हायच्या तिथे एकही गाडी नव्हती, अशी मला मिळालेली माहिती आहे. याचा अर्थ जाणीवपूर्व हे षडयंत्र करत विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे, असा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला.



दंगल करणाऱ्यांनी पोलीस येईपर्यंत धुमाकूळ घातला. पोलीस आल्यावर त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांवर दगडफेक केली. पेट्रोल बॉम्ब टाकले. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे. या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांच्यावर सरकार कडक कारवाई करेल, औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दंगल करणाऱ्यांवर सरकार कायद्यानुसार कठोर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील