Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहील बंद

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना ठाणेकरांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाणेकरांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Youth : ‘युवकांमध्ये प्रचंड सृजनशीलता, नाविन्यता, कौशल्यता आणि कल्पकता’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य

Multipurpose Use : महसूलवाढीसाठी कोल्हापूर चित्रनगरी व एन. डी. स्टुडिओचा बहुउद्देशीय वापर करणार

मुंबई : राज्यातील चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रीकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूर

Marathi Rapper RocKsun : मराठमोळा रॅपर रॉक्सनच्या गाण्यांची हिप-हॉपमध्ये क्रेझ

मुंबई: महाराष्ट्राच्या हिप-हॉप क्षेत्रात उदयास आलेला तरुण आणि दमदार आवाज म्हणजे रॉकसन. आपल्या प्रभावी गीतलेखन

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

ट्रम्पकडून ती आनंदवार्ता आली अन् शेअर बाजाराने मोठी उसळी मारली ; नेमकं काय घडलं ?

अमेरिका इराण युद्धामुळे शेअर बाजारात ( Share Market )मोठ्या घडामोडी घडत होत्या. गुंतवणूकदार यामुळे चांगलेच धास्तावाले