Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा राहील बंद

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असताना ठाणेकरांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. ठाणेकरांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसोय होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, तातडीचे आणि अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार दि. १७/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० पासून ते मंगळवार दि. १८/०३/२०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


तसेच, मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी

Nanded Crime : प्रेमाच्या नादात युवकाची चाकूने भोसकून हत्या

नांदेड : नांदेड शहरामध्ये शनिवारी (११जुलै) मध्यरात्री एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सचिन यशवंत काळे (वय

Parth Pawar Engagement : पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली

२९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार सोहळा; मैत्रीण कायनात धार हिच्यासोबत अडकणार विवाहबंधनात मुंबई : महाराष्ट्राचे

Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन अंतराळ मोहिमेसाठी १४ जुलैला होणार रवाना

कझाकस्तान : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या