नवरा-बायकोमध्ये झाला वाद, पतीने पेटवले घर

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घरगुती भांडणामुळे एका पतीने आपल्याच घराला आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.


हे प्रकरण मेरठच्या कंकड ठाणे क्षेत्रातील अमोलिक कॉलनीमधील आहे. येथे अग्निशमन दलाला दुपारी एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दलाचे जवान तेथे पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. चौकशीदरम्यान असे समजले की हे घर भूपेंद्र नावाच्या व्यक्तीचे असून तो टेलरिंगचे काम करतो. भूपेंद्रने गृहक्लेशामुळे घरात आग लावली.


भूपेंद्रचे १० वर्षांपूर्वी निधीशी लग्न झाले होते. दोघांमध्ये पैशावरून सातत्याने वाद होत असे. रविवारी पुन्हा एकदा भूपेंद्र आणि निधी यांच्यात वाद झाला. निधी कशीतरी घरातून बाहेर पडली आणि जवळच्या आपल्या माहेरी गेली. भूपेंद्रला वाटले की निधी आतमध्ये आहे आणि त्याने घराला आग लावून दिली असा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर तो तेथून पळून गेला.


घराला आग लागल्याने संपूर्ण घर धुराने भरून गेले. मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा निघत होत्या. शेजाऱ्यांनी आगीचे लोळ पाहिले आणि फायर सर्व्हिस टीमला सूचना दिली. त्यांनी तातडीने तेथे धाव घेत आग विझवली.


आपले घर जळताना पाहून निधी आपल्या मुलांसह आणि आईसह तेथे पोहोचली. निधीने सांगितले, पती सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. तिने नकार दिला तेव्हा तो भांडायला लागला. त्याला राग आला. आधी त्याने मला खोलीत बंद केले होते. आणि त्यानंतर बाईकमधून पेट्रोल काढू लागला. शेजारच्या काकींनी मला यातून सोडवले आणि मुलांना घेऊन मी माहेरी गेली. या दरम्यान त्याने घराला आग लावली. मलाही जाळून मारण्याचा प्रयत्न करत होता.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती