वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



वारकऱ्यांची मोठी गर्दी आणि नदीतील पाण्याची गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीतील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, वारकऱ्यांनी इंद्रायणीचे पाणी केवळ स्नान, भांडी धुणे किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरावे. मात्र, पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या नळांचे पाणीच वापरावे.



नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे ते दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः, नदीमध्ये कपडे धुणे किंवा अन्य दूषित करणारी कृती करू नये, असे आदेश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका

वारकरी संप्रदायासाठी तुकाराम बीज हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनावर आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच, हा निर्णय घेण्यात आला आहे.



वारकऱ्यांच्या आरोग्यावर भर देण्याचा निर्णय

वारकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि वारकऱ्यांचे आरोग्य यावर भर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि वारकरी संप्रदायाच्या समन्वयाने हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद