वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



वारकऱ्यांची मोठी गर्दी आणि नदीतील पाण्याची गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीतील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, वारकऱ्यांनी इंद्रायणीचे पाणी केवळ स्नान, भांडी धुणे किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरावे. मात्र, पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या नळांचे पाणीच वापरावे.



नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे ते दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः, नदीमध्ये कपडे धुणे किंवा अन्य दूषित करणारी कृती करू नये, असे आदेश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका

वारकरी संप्रदायासाठी तुकाराम बीज हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनावर आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच, हा निर्णय घेण्यात आला आहे.



वारकऱ्यांच्या आरोग्यावर भर देण्याचा निर्णय

वारकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि वारकऱ्यांचे आरोग्य यावर भर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि वारकरी संप्रदायाच्या समन्वयाने हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर