वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र मानून ग्रहण करतात. मात्र, यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



वारकऱ्यांची मोठी गर्दी आणि नदीतील पाण्याची गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यास अथवा स्वयंपाकासाठी वापरण्यास योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीतील पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, वारकऱ्यांनी इंद्रायणीचे पाणी केवळ स्नान, भांडी धुणे किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी वापरावे. मात्र, पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या नळांचे पाणीच वापरावे.



नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

इंद्रायणी नदीच्या पाण्याचा उपयोग करताना कोणत्याही प्रकारे ते दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः, नदीमध्ये कपडे धुणे किंवा अन्य दूषित करणारी कृती करू नये, असे आदेश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराचा धोका

वारकरी संप्रदायासाठी तुकाराम बीज हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनावर आहे. नदीचे पाणी दूषित झाल्यास साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच, हा निर्णय घेण्यात आला आहे.



वारकऱ्यांच्या आरोग्यावर भर देण्याचा निर्णय

वारकऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि वारकऱ्यांचे आरोग्य यावर भर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन आणि वारकरी संप्रदायाच्या समन्वयाने हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु