स्टरलाईट पॉवर कडून शेतकऱ्यांना मोबदला

पालघर(वार्ताहर): गुजरातमधून महाराष्ट्रात हरित ऊर्जा आणण्याच्या प्रकल्पाचे काम २०३० पर्यंत पूर्ण होणार असून ५०० गीगावॅट ऊर्जा निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम असून स्टरलाईट पॉवरने याबाबत ज्यांच्या जमिनीखालून ट्रान्समिशन लाईन जाणार आहे, त्यांना मोबदला देण्याचे धोरण ठरवले आहे. विक्रमगड तालुक्यातील मान गावातील शेतकरी विष्णू चैतन्य दळवी यांना स्टरलाईट पॉवर कडून मोबदला देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.



मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन गुजरातमधून हरित ऊर्जा आणण्याचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा काही भाग वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्टरलाईट पॉवरने त्यांना योग्य मोबदला देण्याचे धोरण निश्चित केले आहे.



अनेक वेळा मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागतात पण स्टरलाईट पॉवरच्या या प्रकल्पात शेतकऱ्याची जमीन त्यांच्या नावावरच राहणार आहेत. सातबारा उताऱ्यावर कंपनीचे कोणतेही नाव लागणार नाही. केवळ ट्रान्समिशन टॉवर्स उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा उपयोग कंपनीमार्फत करण्यात येणार आहे आणि त्याचा योग्य मोबदला सुद्धा देण्यात येणार असल्याचे स्टलाईट पॉवर कडून सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पाचे काम २७ ठिकाणी सुरू असून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने त्याचा मोबदला देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देताना फक्त जमीन नाही तर पिकाचे नुकसान लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्यांना योग्य तो मोबदला कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांची थेट संवाद साधण्याची प्रक्रिया सुद्धा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत त्यांना माहिती दिली जात आहे शेतकऱ्यांच्या हक्काची जपणूक करत त्यांना विश्वासात घेत आणि योग्य मोबदला देतच हा प्रकल्प पुढे नेण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही कंपनीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०