स्टरलाईट पॉवर कडून शेतकऱ्यांना मोबदला

  34

पालघर(वार्ताहर): गुजरातमधून महाराष्ट्रात हरित ऊर्जा आणण्याच्या प्रकल्पाचे काम २०३० पर्यंत पूर्ण होणार असून ५०० गीगावॅट ऊर्जा निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम असून स्टरलाईट पॉवरने याबाबत ज्यांच्या जमिनीखालून ट्रान्समिशन लाईन जाणार आहे, त्यांना मोबदला देण्याचे धोरण ठरवले आहे. विक्रमगड तालुक्यातील मान गावातील शेतकरी विष्णू चैतन्य दळवी यांना स्टरलाईट पॉवर कडून मोबदला देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.



मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन गुजरातमधून हरित ऊर्जा आणण्याचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा काही भाग वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्टरलाईट पॉवरने त्यांना योग्य मोबदला देण्याचे धोरण निश्चित केले आहे.



अनेक वेळा मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागतात पण स्टरलाईट पॉवरच्या या प्रकल्पात शेतकऱ्याची जमीन त्यांच्या नावावरच राहणार आहेत. सातबारा उताऱ्यावर कंपनीचे कोणतेही नाव लागणार नाही. केवळ ट्रान्समिशन टॉवर्स उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा उपयोग कंपनीमार्फत करण्यात येणार आहे आणि त्याचा योग्य मोबदला सुद्धा देण्यात येणार असल्याचे स्टलाईट पॉवर कडून सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पाचे काम २७ ठिकाणी सुरू असून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने त्याचा मोबदला देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देताना फक्त जमीन नाही तर पिकाचे नुकसान लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्यांना योग्य तो मोबदला कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांची थेट संवाद साधण्याची प्रक्रिया सुद्धा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत त्यांना माहिती दिली जात आहे शेतकऱ्यांच्या हक्काची जपणूक करत त्यांना विश्वासात घेत आणि योग्य मोबदला देतच हा प्रकल्प पुढे नेण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही कंपनीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती