मुंबईत अवजड वाहनांना रविवारी 'नो एन्ट्री'

  70

मुंबई (प्रतिनिधी) : होळी, शिमग्याचा सण महाराष्ट्रभर साजरा केला गेला. कामानिमित्त मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये स्थानिक झालेले अनेक चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात निघाले होते. आता सण साजरा करुन चाकरमानी परतीचा प्रवास करणार आहेत. हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उद्या रविवारी १६ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. यासंबंधित अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आली आहे. वाहतूक बंदीतून इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे, ऑक्सिजन अशा जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. उद्या मुंबई-गोवा महामार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. होळीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूकीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.



होळी, शिमगा सण तसेच सलग आलेली सुट्टी यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होती. शिमग्याला गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. हा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिकची खबरदारी घेतली आहे.
Comments
Add Comment

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या