जेईई मेन्स परीक्षा २ एप्रिलपासून होणार सुरू

नाशिक (प्रतिनिधी) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचे आयोजन २ ते ९ एप्रिलदरम्यान केले जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेतली होती.



या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीत जाहीर करण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षा देण्याच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यांपैकी चांगली कामगिरी असलेल्या परीक्षेतील गुण ग्राह्य धरून त्याआधारे राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. जानेवारी सत्राची परीक्षा झालेली असून, आता बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्ये परीक्षेची दुसरी संधी उपलब्ध केली जाणार आहे.



नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार २, ३, ४ आणि ७, ८ एप्रिलला बीई/बीटेकसाठीचा पेपर क्रमांक एक होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपार सत्रामध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या सत्रनिहाय परीक्षा घेतल्या जातील. ही परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असेल. आर्किटेक्चर व डिझाइन क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पेपर क्रमांक २ चे आयोजन ९ एप्रिलला केले जाणार आहे. देशभरातील विविध शहरांवरील परीक्षा केंद्रावर तसेच देशाबाहेर १५ शहरांतील केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.



आता प्रवेशपत्राची प्रतीक्षा

परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असून, आता विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रतीक्षा लागून राहणार आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख, सत्राची वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील उपलब्ध असल्याने परीक्षा वेळेसंदर्भात स्पष्टता येऊ शकणार आहे. साधारणतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या