Amravati Central Bank Fire : अमरावतीमधील सेंट्रल बँकेच्‍या इमारतीला आग; लाखो रुपयांच्‍या नोटा जळून खाक!

मुंबई : अमरावतीमधील (Amravati News) चांदूर रेल्‍वे येथील सेंट्रल बँकेच्‍या इमारतीला भीषण आग (Amravati Central Bank Fire) लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांच्‍या नोटा आणि फर्निचर भस्‍मसात झाले आहे. सुदैवाने या आगीत कसलीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचे शर्थीचे प्रयत्‍न सुरु होते.



मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँकेच्‍या चांदूर रेल्‍वे येथील शाखेत नियमित कामकाज सुरू असताना दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास एका ठिकाणाहून धूर निघत असल्‍याचे निदर्शनास येताच पळापळ झाली. ग्राहक आणि बँकेतील कर्मचारी लगेच बाहेर पडले. आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. (Amravati Central Bank Fire) आगीच्‍या घटनेची माहिती चांदूर रेल्‍वे नगर परिषदेच्‍या अग्निशमन दलाला देण्‍यात आली. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्‍थळी पोहोचले. आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले. आग आटोक्‍यात येत नसल्‍याचे पाहून तिवसा आणि धामणगाव रेल्‍वे येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्‍यात आले.


आगीची माहिती मिळताच घटनास्‍थळी बघ्‍यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी देखील तत्‍काळ पोहचून बंदोबस्‍त वाढवला.बँकेतील एसी मध्‍ये शॉर्ट सर्किट झाले आणि तेथून ही आग पसल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. आगीत नेमके मालमत्‍तेचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, घटनास्थळ नजीकचे सर्व दुकाने बंद करण्यात आले होते. आग लागल्याच्या अर्धा तासानंतर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येऊन संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले. (Amravati Central Bank Fire)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये