वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाले असून वाडा तालुका देखरेख संघ, वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था, चांबळे सेवा सहकारी संस्था, आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल मध्ये होणार आहेत. या संस्थांची निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. तर २४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे.



वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था असून या संस्थेच्या मालकीची वाडा शहरात तीन मजली इमारत सुद्धा आहे. यात व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकले असून आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने निवडून येणारे संस्थेचे पदाधिकारी या वादग्रस्त इमारतीचा टिळा कसा सोडवतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाडा ग्रुप सेवा सहकारी सोसायटीमध्ये सदस्य संख्या १६९६ आहेत तर मतदार संख्या १२५१ असून या संस्थेत एकूण २४ गावांचा समावेश आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल आठ ते नऊ कोटींची आहे. या संस्थेमध्ये अनेक मातब्बर राजकारणी सदस्य असल्याने या संस्थेच्या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. तर चांबळे सेवा सहकारी संस्थेची आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा असून या संस्थेच्या माध्यमातून लडकू दत्तात्रय शेलार यांनी वाडा तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती पद भूषवले होते. या संस्थेत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे