वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

  40

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाले असून वाडा तालुका देखरेख संघ, वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था, चांबळे सेवा सहकारी संस्था, आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल मध्ये होणार आहेत. या संस्थांची निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. तर २४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे.



वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था असून या संस्थेच्या मालकीची वाडा शहरात तीन मजली इमारत सुद्धा आहे. यात व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे. मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकले असून आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने निवडून येणारे संस्थेचे पदाधिकारी या वादग्रस्त इमारतीचा टिळा कसा सोडवतात याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाडा ग्रुप सेवा सहकारी सोसायटीमध्ये सदस्य संख्या १६९६ आहेत तर मतदार संख्या १२५१ असून या संस्थेत एकूण २४ गावांचा समावेश आहे. या सोसायटीची वार्षिक उलाढाल आठ ते नऊ कोटींची आहे. या संस्थेमध्ये अनेक मातब्बर राजकारणी सदस्य असल्याने या संस्थेच्या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. तर चांबळे सेवा सहकारी संस्थेची आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा असून या संस्थेच्या माध्यमातून लडकू दत्तात्रय शेलार यांनी वाडा तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती पद भूषवले होते. या संस्थेत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या