झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार

  70

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर एकामागोमाग एक नवीन मालिका सुरू होत आहेत. वाहिन्यांकडून देखील अगदी कमी कालावधीसाठी मालिका चालू ठेवण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या 1 ते 2 वर्षात जुन्या मालिका बंद करून त्या जागी नवीन मालिका सुरू केल्या जात आहेत.आता झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. याशिवाय, इतर मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

वर्षभरापूर्वी सुरू झालेली झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. सुरुवातीला मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, नंतर मालिका टीआरपीमध्ये मागे पडल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'पुन्हा कर्तव्य आहे' सोबतच 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता रोहित परशुरामने इंस्टाग्रामवर पोस्ट याबाबतची माहिती दिली होती. या दोन्ही मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली होती. मात्र, आता झी मराठीने या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

झी मराठीने नवीन मालिकेची देखील घोषणा केली आहे. लवकरच 'चल भावा सिटीत' हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो मध्ये अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे. हा शो प्रेक्षकांना रात्री 9.30 वाजता पाहायला मिळेल. याशिवाय, 'लाखात एक आमचा दादा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या तीन मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट