झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर एकामागोमाग एक नवीन मालिका सुरू होत आहेत. वाहिन्यांकडून देखील अगदी कमी कालावधीसाठी मालिका चालू ठेवण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या 1 ते 2 वर्षात जुन्या मालिका बंद करून त्या जागी नवीन मालिका सुरू केल्या जात आहेत.आता झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. याशिवाय, इतर मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

वर्षभरापूर्वी सुरू झालेली झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. सुरुवातीला मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, नंतर मालिका टीआरपीमध्ये मागे पडल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'पुन्हा कर्तव्य आहे' सोबतच 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता रोहित परशुरामने इंस्टाग्रामवर पोस्ट याबाबतची माहिती दिली होती. या दोन्ही मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली होती. मात्र, आता झी मराठीने या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

झी मराठीने नवीन मालिकेची देखील घोषणा केली आहे. लवकरच 'चल भावा सिटीत' हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो मध्ये अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे. हा शो प्रेक्षकांना रात्री 9.30 वाजता पाहायला मिळेल. याशिवाय, 'लाखात एक आमचा दादा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या तीन मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : आज विषय गंभीर! रितेश भाऊंचा 'धक्का' कोणाला बसणार? प्रोमो आला समोर!

मुंबई : कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस मराठी सीझन ६' ( Bigg

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता

Savni Ravindra : गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु; 'सावनी रेकॉर्डझ्' ची घोषणा

मुंबई : मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि