रेल्वेचे गेट तोडून ट्रक आला रुळांवर, भरधाव मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडकला

जळगाव : पहाटे चारच्या सुमारास बोदवड जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक वेगाने आला. रेल्वेचे गेट तोडून ट्रक थेट रुळांवर आला. सुसाट रुळांवर आलेल्या ट्रकने भरधाव येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. अपघातात जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने कारवाई केली आणि सकाळी ७.५० पर्यंत रेल्वेची वाहतूक सुरळीत केली.





अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीस ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे काही तास रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई - हावडा मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व ट्रेनची वाहतूक मंदावली होती.
Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये