रेल्वेचे गेट तोडून ट्रक आला रुळांवर, भरधाव मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडकला

Share

जळगाव : पहाटे चारच्या सुमारास बोदवड जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक वेगाने आला. रेल्वेचे गेट तोडून ट्रक थेट रुळांवर आला. सुसाट रुळांवर आलेल्या ट्रकने भरधाव येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. अपघातात जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने कारवाई केली आणि सकाळी ७.५० पर्यंत रेल्वेची वाहतूक सुरळीत केली.

अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीस ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे काही तास रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई – हावडा मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व ट्रेनची वाहतूक मंदावली होती.

Recent Posts

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

4 minutes ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

19 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

34 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

44 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

1 hour ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago