धूळवडीच्या दिवशी बॉलिवूडवर शोककळा, अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन

मुंबई : रंग खेळत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी धूळवड साजरी केली जात आहे. या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून देब मुखर्जी यांची तब्येत खालावली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते.



शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता देब मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली, असे अयान मुखर्जी यांनी सांगितले. संध्याकाळी चार नंतर त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.



'आंसू बन गए फूल', 'अभिनेत्री', 'दो आंखें', 'बातों बातों में', 'कमीने' आणि 'गुदगुदी' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्यांचा मुलगा आयान मुखर्जी आता बॉलिवूडमधली लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत आहे. नवरात्रउत्सवात देब मुखर्जी विशेष चर्चेत यायचे. ते दरवर्षी 'नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल'चं आयोजन करत. हा मुंबईतला सगळ्यात मोठा दुर्गोत्सव आहे. यासाठी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी देखील या दुर्गोत्सवाचे काम करतात. दुर्गोत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहे.

देब मुखर्जी यांचे भाऊ जॉय मुखर्जी हे देखील अभिनेता होते. तर दुसरे भाऊ शोमू मुखर्जी. शोमू मुखर्जी यांचं लग्न काजोलची आई तनुजा यांच्याशी झाले. यामुळे देब मुखर्जी हे काजोलचे काका. काजोलला नेहमी त्यांनी लेकीचे प्रेम दिले.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण