धूळवडीच्या दिवशी बॉलिवूडवर शोककळा, अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन

मुंबई : रंग खेळत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी धूळवड साजरी केली जात आहे. या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून देब मुखर्जी यांची तब्येत खालावली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते.



शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता देब मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली, असे अयान मुखर्जी यांनी सांगितले. संध्याकाळी चार नंतर त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.



'आंसू बन गए फूल', 'अभिनेत्री', 'दो आंखें', 'बातों बातों में', 'कमीने' आणि 'गुदगुदी' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्यांचा मुलगा आयान मुखर्जी आता बॉलिवूडमधली लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत आहे. नवरात्रउत्सवात देब मुखर्जी विशेष चर्चेत यायचे. ते दरवर्षी 'नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल'चं आयोजन करत. हा मुंबईतला सगळ्यात मोठा दुर्गोत्सव आहे. यासाठी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी देखील या दुर्गोत्सवाचे काम करतात. दुर्गोत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहे.

देब मुखर्जी यांचे भाऊ जॉय मुखर्जी हे देखील अभिनेता होते. तर दुसरे भाऊ शोमू मुखर्जी. शोमू मुखर्जी यांचं लग्न काजोलची आई तनुजा यांच्याशी झाले. यामुळे देब मुखर्जी हे काजोलचे काका. काजोलला नेहमी त्यांनी लेकीचे प्रेम दिले.
Comments
Add Comment

Mumbai HC Voting List : मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; मतदार यादी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या!

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Government Bodies) निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई विमानतळावर २० नोव्हेंबरला दोन्ही रनवे तात्पुरते बंद

मुंबई : जगातील सर्वाधिक व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात