छत्तीसगडमध्ये १७ नक्षलवादी आले शरण, शरण आलेल्यांपैकी ९ जणांवर होते २४ लाखांचे बक्षिस

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात १७ नक्षलवादी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शरण आले आहेत. शरण आलेल्या १७ नक्षलवाद्यांपैकी ९ जणांवर मिळून एकूण २४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. शरण आलेले सर्व नक्षलवादी गंगालूर भागात सक्रीय होते. नक्षलवाद्यांचे अमानवी विचार, आदिवासींवर नक्षलवाद्यांच्या नेत्यांकडूनच सुरू असलेला अन्याय, सुरक्षा दलांचा वाढता प्रभाव ही बदलती परिस्थिती बघून निराश झालेल्या १७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली.



छत्तीगडमधील नक्षलवाद प्रभावी भागांमध्ये सध्या निया नेल्लानार ही सरकारी योजना सुरू आहे. निया नेल्लानार म्हणजे 'आपले चांगले गाव'. या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात सक्रीय असलेल्या १७ नक्षलवाद्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतला. शरण आलेल्यांमध्ये दिनेश मोडियम (३६) आहे. दिनेश मोडियम हा माओवादी नक्षलवाद्यांचा डिव्हिजनल कमिटी मेंबर होता. बीजापूर जिल्ह्यातील २६ प्रकरणांमध्ये तपास पथक दिनेश मोडियम याला शोधत होते. त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते. दिनेशच्या दोन्ही पत्नी, ज्योती टाटी उर्फ काला मोडियम (३२) आणि दुला करम (३२) या दोघी एरिया कमिटी मेंबर होत्या. या दोघींवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस लावण्यात आले होते.



शरण आलेल्या नक्षलवाद्यांना सरकारी योजनेनुसार २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेतले जाईल. यंदाच्या वर्षी बीजापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६५ नक्षलवादी शरण आले आहेत. याआधी मागच्या वर्षी बस्तरमध्ये ७९२ नक्षलवादी शरण आले होते.

नक्षलवाद्यांच्या शरणागतीचा कार्यक्रम स्थानिक पोलीस तसेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांच्या उपस्थितीत झाला.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी