उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर

  99

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार प्रथम जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला श्रीक्षेत्र देहू होणार आहे. लक्षावधी वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळ्याच्या मुख्य दिनी या पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सन्मानित केले जाणार आहे.


दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी संतांचे वंशज तसेच मानाच्या मुख्य सात पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार  आहेत. वारकरी संप्रदायातील अतुलनीय योगदानाबद्दल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव केला जाणार आहे. याबाबतची माहिती  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्रीपुरुषोत्तम महाराज मोरे व विश्वस्त यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.


एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या कारकि‍र्दीत त्यांनी वारकऱ्यांच्या हिताचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. होते. या निर्णयांमध्ये वारकऱ्यांच्या दिंड्यांना दिलेला निधी, विमा छत्र योजना ,  संत व तीर्थक्षेत्रांसाठी करण्यात आलेले विकासकार्य, प्रत्येक साधुसंतांची केलेली आपुलकीने विचारपूस व घेतलेली काळजी  व अध्यात्मिक सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत असणारा थेट संपर्क ह्या शिंदेच्या जमेच्या बाजू आहेत अशी माहिती मिळत आहे.
Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड