मुंबई : महिलांना सक्षमीकरण करण्यात व त्यांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता दाखविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वे आघाडीवर असते. रेल्वेमध्ये महिला शक्तीची भूमिका बहुआयामी आहे आणि कोणत्याही संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी ती महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीटविरहित प्रवासाला तोंड देण्यामध्ये लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. सुरतच्या मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि दादरच्या उपमुख्य तिकीट निरीक्षक मल्लिगा हे अशा दोन महिला कर्मचारी आहेत. ज्यांनी या कामात अनुकरणीय कामगिरी दाखवली आहे.
दोघांनीही आपल्या विभागात तिकीट तपासणीत सर्वाधिक महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल यांनी अतुलनीय सेवा आणि कार्य दाखवले, मोठ्या उत्साहाने स्वतंत्रपणे काम करण्याची त्यांची दृढनिश्चय आणि क्षमता दाखवली.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागाबाहेरील ४ हजार ४७०हून अधिक अनधिकृत प्रवासी शोधून तिकीट तपासणीतून सुमारे ३३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…