Western Railway : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई : महिलांना सक्षमीकरण करण्यात व त्यांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता दाखविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वे आघाडीवर असते. रेल्वेमध्ये महिला शक्तीची भूमिका बहुआयामी आहे आणि कोणत्याही संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी ती महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीटविरहित प्रवासाला तोंड देण्यामध्ये लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. सुरतच्या मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि दादरच्या उपमुख्य तिकीट निरीक्षक मल्लिगा हे अशा दोन महिला कर्मचारी आहेत. ज्यांनी या कामात अनुकरणीय कामगिरी दाखवली आहे.



दोघांनीही आपल्या विभागात तिकीट तपासणीत सर्वाधिक महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल यांनी अतुलनीय सेवा आणि कार्य दाखवले, मोठ्या उत्साहाने स्वतंत्रपणे काम करण्याची त्यांची दृढनिश्चय आणि क्षमता दाखवली.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागाबाहेरील ४ हजार ४७०हून अधिक अनधिकृत प्रवासी शोधून तिकीट तपासणीतून सुमारे ३३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री