'राजवाडा रिकामा करा, महाराज येत आहेत'; नेपाळमध्ये सत्तांतराचे वारे

काठमांडू : भारताच्या शेजारी असलेल्या आणि २००८ पर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सध्या माओवादी कम्युनिस्टांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांविरोधात नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे. बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याला निमित्त आहे ते ताज्या घटनाक्रमाचे...



माओवादी सत्तेत आल्यानंतर राजधानी काठमांडूतून बाहेर जाऊन स्थायिक झालेले नेपाळचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव पुन्हा एकदा काठमांडूत आले आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळ हजारो तरुणांनी राजाचे स्वागत केले. याप्रसंगी 'नारायणहिटी खाली गर, हाम्रो राजा आउंदै छन' आणि 'जय पशुपतिनाथ, हाम्रो राजालाई स्वागत छ' या दोन नेपाळी भाषेतील घोषणा वारंवार देण्यात आल्या. नारायणहिटी हे नेपाळच्या राजवाड्याचे नाव आहे. नेपाळी तरुण सरकारला उद्देशून राजवाडा रिकामा करा, महाराज येत आहेत आणि जय पशुपतीनाथ, आमच्या महाराजांचे स्वागत आहे अशा घोषणा देत होते.



मागील दोन महिने ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव हे पोखरा या पर्यटनस्थळी होते. तिथे त्यांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. नागरिकांशी थेट संवाद साधला. ज्ञानेंद्र यांच्या या दौऱ्यातून त्यांनी नेपाळच्या राजकारणात सक्रीय होत असल्याचा स्पष्ट संकते दिला. आता ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव काठमांडूत येताच 'राजवाडा रिकामा करा, महाराज येत आहेत' अशी घोषणा तरुण देऊ लागले आहेत. यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.



नेपाळच्या संसदेत १४ सदस्य असलेल्या राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टीने जाहीरपणे ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांना पाठिंबा दिला आहे. तर एखाद्या पक्षाचे वेगळे मत असू शकते पण नेपाळमध्ये राजेशाही ही इतिहासजमा झाली आहे आणि पुन्हा येणार नाही, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

नेपाळमध्ये राजेशाहीची अखेर २००८ मध्ये झाली. राजेशाही संपल्यापासून नेपाळमध्ये आतापर्यंत १३ वेळा सत्तांतर झाले. पण अद्याप देशात स्थैर्य आलेले नाही. याउलट नेपाळमध्ये राजेशाही सलग २४० वर्षे कार्यरत होती. यामुळे राजकीय स्थैर्यासाठी नेपाळची तरुणाई पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी करू लागली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव भूतानच्या दौऱ्यावर गेले होते. महाराज नसूनही त्यावेळी भूतानमध्ये ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांच्यासाठी सगळीकडे लाल गालिचा अंथरण्यात आला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात एक व्हिडीओ करुन ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव नेपाळमधील अस्थिरतेविषयी चिंता व्यक्त केली होती. देशाच्या प्रगतीसाठी स्थिर सत्तेची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली होती. यानंतर आता मार्च महिन्यात ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांचे काठमांडूत आगमन होताच तरुणांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; रस्त्यावर उतरले हजारो नागरिक

मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan-Occupied Kashmir - PoK) सुरू असलेल्या पाकिस्तानविरोधी आंदोलनाने (Protest) मंगळवारी नवे

US Birthright Citizenship : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; जन्मसिद्ध नागरिकत्व कायम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

Venezuela Earthquake : देव तारी, त्याला कोण मारी! व्हेनेझुएला भूकंपातील ११ वर्षीय मुलाच्या बचावाचा व्हिडिओ व्हायरल

व्हेनेझुएला : व्हेनेझुएलामध्ये (Venezuela) झालेल्या भीषण भूकंपानंतर (Earthquake) आशेचा किरण ठरलेली घटना समोर आली आहे. सलग दोन

Pakistan Airstrike on Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मध्यरात्री हवाई हल्ला; ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी

कराची : कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात्मक कारवाईचा दावा करत पाकिस्तानने रविवारी आणि सोमवारी

Saudi Arabia Helicopter Crash : सौदी अरेबियात अरामकोचं हेलिकॉप्टर कोसळलं; १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

सौदी अरेबिया : फ्रान्समधील खासगी विमान (Private Plane) दुर्घटनेनंतर आता सौदी अरेबियामध्ये आणखी एक मोठी हवाई दुर्घटना घडली