मुंबईच्या लिलावती रुग्णालयात काळी जादू

मुंबई : ट्रस्टच्या निधीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सेलिब्रेटींचे रुग्णालय अशीही लिलावती रुग्णालयाची ओळख आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दिग्गज उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात येतात. यामुळे मुंबईसह देशभर ख्याती असलेल्या या रुग्णालयात जमिनीखाली पुरलेले आठ कलश आढळले आहेत. या कलशांमध्ये माणसांची हाडं आणि केस आहेत. पुरुन ठेवलेल्या या कलशांची स्थिती बघून त्यांचा वापर काळी जादू करण्यासाठी झाला असल्याचे मत बघणाऱ्यांनी व्यक्त केले आहे.



याआधी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर झाला आणि लिलावती रुग्णालयात १२०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप झाला. आता रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णांना बरे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले रुग्णालय सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.



लिलावतीच्या माजी ट्रस्टींनी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर करुन १२०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला. पाठोपाठ लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी
रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक घोटाळा प्रकरणी लिलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या प्रकरणात वांद्रे पोलिसांसह ईडीकडे तक्रार केली आहे. निधी गैरवापर प्रकरणी तपास करण्याचे निर्देश वांद्रे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस काळी जादू प्रकरणाचा तपास करत आहेत.
Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम