मुंबईच्या लिलावती रुग्णालयात काळी जादू

मुंबई : ट्रस्टच्या निधीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सेलिब्रेटींचे रुग्णालय अशीही लिलावती रुग्णालयाची ओळख आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दिग्गज उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात येतात. यामुळे मुंबईसह देशभर ख्याती असलेल्या या रुग्णालयात जमिनीखाली पुरलेले आठ कलश आढळले आहेत. या कलशांमध्ये माणसांची हाडं आणि केस आहेत. पुरुन ठेवलेल्या या कलशांची स्थिती बघून त्यांचा वापर काळी जादू करण्यासाठी झाला असल्याचे मत बघणाऱ्यांनी व्यक्त केले आहे.



याआधी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर झाला आणि लिलावती रुग्णालयात १२०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप झाला. आता रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णांना बरे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले रुग्णालय सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.



लिलावतीच्या माजी ट्रस्टींनी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर करुन १२०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला. पाठोपाठ लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी
रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक घोटाळा प्रकरणी लिलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या प्रकरणात वांद्रे पोलिसांसह ईडीकडे तक्रार केली आहे. निधी गैरवापर प्रकरणी तपास करण्याचे निर्देश वांद्रे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस काळी जादू प्रकरणाचा तपास करत आहेत.
Comments
Add Comment

महिलांची डिजिटल बदनामी ठरणार गुन्हा; ३ वर्षांच्या कोठडीची तरतूद

भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक कायदा एकमताने विधान परिषदेत मंजूर मुंबई : सोशल मीडिया किंवा इतर

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे.

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा