Holi : रासायनिक रंग प्राणी पक्ष्यांसाठी धोकादायकच!

  84

रासायनिक रंग पोटात गेल्याने प्राण्यांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम


प्रशांत सिनकर


ठाणे : होळीच्या (Holi) दिवशी जबरदस्तीने रंग फासून रंगाचा बेरंग करू नका, असे आवाहन केले जात असले तरी जोर जबरदस्तीने मुक्या जीवाला रंग फसले जातात. मात्र रंगामुळे मुक्याजीवांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत. रासायनिक अथवा विषारी रंग प्राण्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असून, डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.


रंगाने खेळताना नैसर्गिक अथवा गुलालाचे रंग उधळून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केलं जातं. मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातो आहे. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सर्वांना ज्ञात असताना देखील अनेकजण होळीच्या (Holi) दिवशी रासायनिक रंगाचा वापर करतात. काही वेळा मजेखातर प्राणी पक्ष्यांना रंग लावण्याचे प्रकार घडतात. परंतु रंगाचे दुष्परिणाम प्राणी पक्ष्यांना भोगावे लागत असल्याची माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली.



प्राण्याच्या अंगावर पाणी टाकल्यावर हे पाणी पटकन जीभेने चाटून काढतात. ऑईलपेंटचा रंग कुत्रा, मांजर, ससा अशा केसाळ प्राण्यांच्या अंगावर सुकला तर त्यांचे केस निखळण्याची शक्यता अधिक असते. अंग चाटताना हे केस उपटून त्या ठिकाणी जखम होते. मुक्या प्राण्यांच्या अंगाला फसलेला रासायनिक रंग प्राण्यांच्या जीवावर उठू शकतो.


उष्मा वाढला असून रस्त्यावरचे प्राणी पक्षी मिळेल ते पाणी पितात. यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी रस्त्यावर पाणी सांडते आणि हे पाणी कुत्रा, मांजर, कबुतर, चिमणी कावळा पक्षी हे पाणी पितात, मात्र रंगाचे पाणी प्यायल्याने पशुपक्ष्यांना अपायकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना