Holi : रासायनिक रंग प्राणी पक्ष्यांसाठी धोकादायकच!

रासायनिक रंग पोटात गेल्याने प्राण्यांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम


प्रशांत सिनकर


ठाणे : होळीच्या (Holi) दिवशी जबरदस्तीने रंग फासून रंगाचा बेरंग करू नका, असे आवाहन केले जात असले तरी जोर जबरदस्तीने मुक्या जीवाला रंग फसले जातात. मात्र रंगामुळे मुक्याजीवांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत. रासायनिक अथवा विषारी रंग प्राण्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असून, डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.


रंगाने खेळताना नैसर्गिक अथवा गुलालाचे रंग उधळून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केलं जातं. मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातो आहे. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सर्वांना ज्ञात असताना देखील अनेकजण होळीच्या (Holi) दिवशी रासायनिक रंगाचा वापर करतात. काही वेळा मजेखातर प्राणी पक्ष्यांना रंग लावण्याचे प्रकार घडतात. परंतु रंगाचे दुष्परिणाम प्राणी पक्ष्यांना भोगावे लागत असल्याची माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली.



प्राण्याच्या अंगावर पाणी टाकल्यावर हे पाणी पटकन जीभेने चाटून काढतात. ऑईलपेंटचा रंग कुत्रा, मांजर, ससा अशा केसाळ प्राण्यांच्या अंगावर सुकला तर त्यांचे केस निखळण्याची शक्यता अधिक असते. अंग चाटताना हे केस उपटून त्या ठिकाणी जखम होते. मुक्या प्राण्यांच्या अंगाला फसलेला रासायनिक रंग प्राण्यांच्या जीवावर उठू शकतो.


उष्मा वाढला असून रस्त्यावरचे प्राणी पक्षी मिळेल ते पाणी पितात. यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी रस्त्यावर पाणी सांडते आणि हे पाणी कुत्रा, मांजर, कबुतर, चिमणी कावळा पक्षी हे पाणी पितात, मात्र रंगाचे पाणी प्यायल्याने पशुपक्ष्यांना अपायकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड