Holi : रासायनिक रंग प्राणी पक्ष्यांसाठी धोकादायकच!

रासायनिक रंग पोटात गेल्याने प्राण्यांच्या पचनक्रियेवर विपरीत परिणाम


प्रशांत सिनकर


ठाणे : होळीच्या (Holi) दिवशी जबरदस्तीने रंग फासून रंगाचा बेरंग करू नका, असे आवाहन केले जात असले तरी जोर जबरदस्तीने मुक्या जीवाला रंग फसले जातात. मात्र रंगामुळे मुक्याजीवांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत. रासायनिक अथवा विषारी रंग प्राण्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असून, डोळ्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो.


रंगाने खेळताना नैसर्गिक अथवा गुलालाचे रंग उधळून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केलं जातं. मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातो आहे. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम सर्वांना ज्ञात असताना देखील अनेकजण होळीच्या (Holi) दिवशी रासायनिक रंगाचा वापर करतात. काही वेळा मजेखातर प्राणी पक्ष्यांना रंग लावण्याचे प्रकार घडतात. परंतु रंगाचे दुष्परिणाम प्राणी पक्ष्यांना भोगावे लागत असल्याची माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर यांनी दिली.



प्राण्याच्या अंगावर पाणी टाकल्यावर हे पाणी पटकन जीभेने चाटून काढतात. ऑईलपेंटचा रंग कुत्रा, मांजर, ससा अशा केसाळ प्राण्यांच्या अंगावर सुकला तर त्यांचे केस निखळण्याची शक्यता अधिक असते. अंग चाटताना हे केस उपटून त्या ठिकाणी जखम होते. मुक्या प्राण्यांच्या अंगाला फसलेला रासायनिक रंग प्राण्यांच्या जीवावर उठू शकतो.


उष्मा वाढला असून रस्त्यावरचे प्राणी पक्षी मिळेल ते पाणी पितात. यामुळे रंगपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी रस्त्यावर पाणी सांडते आणि हे पाणी कुत्रा, मांजर, कबुतर, चिमणी कावळा पक्षी हे पाणी पितात, मात्र रंगाचे पाणी प्यायल्याने पशुपक्ष्यांना अपायकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ

तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला

आश्रय योजनेतील पहिल्या ५१२ सदनिकांचे डिसेंबर अखेरपर्यंत सफाई कामगारांना होणार वाटप

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई

आज मुंबईत पंतप्रधान मोदींची 'समुद्री व्हिजन' परिषद!

'मॅरिटाइम सीईओ फोरम'ला करणार संबोधित; १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणार मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)