

स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली
पुणे : स्वारगेट एसटी डेपोतील एका दिवे बंद असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू ...
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ हॉर्सपॉवर पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंप वापरणारे आहेत. या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४' च्या निकषात बदल करून १५ अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंप वापरणाऱ्यांना शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाते. जर निकष बदलले आणि १५ अश्वशक्तीपर्यंतच्या (१५ हॉर्सपॉवर) कृषीपंपांना वीज मोफत दिली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वास विधान परिषदेतील आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.