Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश


खासदार नारायण राणे यांनी मंजूर केला निधी


रत्नागिरी  : कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण निर्माण होत असल्याने ती हलवण्याची मागणी स्थानिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्याकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी मंजुरीसाठी पत्र दिले.



यानुसार रत्नागिरीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये या रोहित्र स्ट्रक्चर स्थलांतरणासाठी २२ लाख ६९ हजार ९६८ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना खा. नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार या कामाचा निधी महावितरणकडे वर्ग झाला असून येत्या दोन दिवसांत ही रोहित्रे हलविण्यात येणार आहेत. गतिमानतेने झालेल्या या कामाबद्दल आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.