New Mumbai : नवी मुंबई हद्दीतील १४ गावांचे भवितव्य काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष


मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्याच्या विधानसभेत अनेक मुद्द्यांवरून चर्चासत्रा दरम्यान नेत्यांमध्ये शाब्दिक खटकेही उडताना दिसत आहेत. यात आता आणखी एका वादंगाने भर घातली असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नवा संघर्ष आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची १४ गावे नवी मुंबई महापालिका (New Mumbai) हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं असून, यामध्ये शीळ तळोजामधील १४ गावे नवी मुंबई पालिकेत नको स्पष्ट लिहिण्यात आले आहे. याच कारणामुळे आता ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष डोके वर काढताना दिसत आहे.



नवी मुंबई महापालिकेत (New Mumbai) शीळ तळोजालगत असणारी १४ गावे समाविष्ट करुन घेण्यास गणेश नाईक यांचा विरोध कायम असून, यामागे काही कारणं पुढे करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. ही गावे शीळ- तळोजा रस्त्यालगत असून, ती कल्याणच्या हद्दीत आहेत. ज्यामुळे नवी मुंबईला जोडण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या शक्य नसून या गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्यास सहा हजार कोटींचा निधी लागणार आहे.


याचा भार नवी मुंबईच्या (New Mumbai) जनतेला बसणार असल्याची बाब पुढे केली. या गावांमध्ये अनधिकृत भंगार वाले आहेत, यामुळे गणेश नाईक यांनी या गावांना जोडण्यास विरोध केला होता. वरील गावे नवी मुंबईत समाविष्ट करायची असल्यास शासनाने निधी द्यावा, तसेच या चौदा गावांना जोडणारा एक बोगदा बांधून द्यावा, याशिवाय अनधिकृत भंगारवाल्यांना इथून बाहेरचा रस्ता दाखवत ती जागा महापालिकेच्या हाती द्यावी अशा काही मागण्या गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीआधी केल्या होत्या. या मागण्या आजही कायम असून, त्यांनी याच संदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यामुळे आता सीएम फडणवीसांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र