Youth Fitness And Weight Loss : फिटनेसच्या नादात १८ वर्षीय तरुणी जीवाला मुकली!

केरळ : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घडलेली एक धक्कादायक घटना केरळमध्ये समोर आली आहे. फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या नादात १८ वर्षीय तरुणीने आपले प्राण गमावले आहेत. सोशल मीडियावर दिसणाऱ्या फिटनेस ट्रेंडच्या आहारी जाऊन तिने स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम ओढवून घेतला.(Youth Fitness And Weight Loss)


ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी युट्यूबवरील विविध प्रकारच्या फिटनेस टिप्स फॉलो करत होती. ती फक्त लिक्विड डाएटवर होती आणि विशेष म्हणजे ती गरम पाण्याशिवाय काहीच घेत नव्हती. अन्नाचा पूर्णपणे त्याग केल्यामुळे तिला 'एनोरेक्सिया' हा मानसिक आजार जडला होता. घरच्यांनी तिला अनेकदा अन्न देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ते लपवून ठेवायची. वाढत्या वजनाच्या भीतीमुळे तिने डॉक्टरांचा सल्लाही नाकारला होता.(Youth Fitness And Weight Loss)



थलासेरी सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले की, मुलीला १२ दिवसांपूर्वी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे वजन केवळ २४ किलो इतके कमी झाले होते. ती इतकी अशक्त होती की, तिला बेडवरून उठणेही शक्य नव्हते. तिची शुगर लेव्हल, सोडियम आणि ब्लडप्रेशर सतत घटत होते. अखेर ती व्हेंटिलेटरवर गेली, मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि रविवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Youth Fitness And Weight Loss)


ही घटना सोशल मीडियावरून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीकडे तरुणाईने डोळसपणे पाहण्याची गरज अधोरेखित करते. फिटनेस आणि आरोग्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१