मणिपूर अपघातात ३ जवान शहीद, १३ जखमी

सेनापती जिल्ह्यात सैन्याचा ट्रक दरीत कोसळला


इंफाळ : मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील चांगौबंग गावात भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत बीएसएफचे 3 जवान हुतात्मा झाले, तर 13 जवान जखमी झाले.

लष्कराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जवानाने रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. मृत जवानांचे शव सेनापती जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.


तर जखमी झालेल्या 13 जवानांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मणिपूरच्या राज्यपाल कार्यालयाने हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करत जखमी जवानांना लवकर बरे वाटावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात