Sairat : पुन्हा वाजणार झिंग झिंग झिंगाट! 'या' तारखेला री-रीलिज होणार आर्ची-परशाचा सैराट

मुंबई : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' (Sairat) चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशाने महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. आता हे वेड पुन्हा लावण्यासाठी सैराटची टीम सज्ज झाली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात जुने चित्रपट री-रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्याप्रमाणे आता सैराट चित्रपट सुद्धा तब्बल ९ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



"आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. सैराटने महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल , याची मला खात्री आहे." असे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटले.



कधी होणार प्रदर्शित?


रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता 'सैराट'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.



सैराट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग - रिंकू राजगुरू


“सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन,” असे रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) म्हटले आहे.

Comments
Add Comment

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या