Team india: २ वर्ल्डकप, २ टी-२० वर्ल्डकप आणि ३ चॅम्पियन्स ट्रॉफी...भारताच्या नावावर ७ आयसीसी खिताब

मुंबई: भारताने रविवारी न्यूझीलंडला चार विकेटनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने आपला सातवा आयसीसीचा खिताब मिळवला आहे. या आठ संघांच्या स्पर्धेत भारताने आपला तिसरा विजय मिळवला. भारत दीर्घकाळापासून वर्ल्ड क्रिकेटच्या प्रमुख संघांपैकी एक आहे. ते सातत्याने या नॉकआऊट पर्यंत पोहोचत होते. भारतीय संघाने २००३ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९-२१ आणि २०२१-२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचले होते.


आयसीसीच्या एकूण खिताबांपैकी बोलायचे झाल्यास तर ऑस्ट्रेलिया सगळ्यात यशस्वी संघ आहे. त्यांनी सहावेळा वनडे वर्ल्डकप २००३, २००७, २०१५, २०२३ , एकदा टी-२० वर्ल्डकप २०२१, दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी(२००६, २००९) आणि एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(२०२१-२३) जिंकला आहे. यासोबतच एकूण मिळून १० खिताब होतात.



भारताचे आयसीसी स्पर्धेतील खिताब


१९८३ वनडे वर्ल्डकप - कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडिजला हरवत त्यांनी नवा इतिहास रचला.


२००२ चॅम्पियन्स ट्रॉफी(श्रीलंकेसोबत संयुक्तपणे) - सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने शानदार कामगिरी केली. मात्र सातत्याने पावसामुळे श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर करावी लागली.


२००७ टी-२० वर्ल्डकप - महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यांनी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले.


२०११ वनडे वर्ल्डकप - धोनीच्या नेतृत्वात भारताने तब्बल २८ वर्षांनी श्रीलंकेला हरवत दुसरा वनडे वर्ल्डकप जिंकला.


२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी - धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला पाच धावांनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.


२०२४ टी-२० वर्ल्डकप - विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० करिअरमधीन अंतिम टप्प्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दुसरा टी-२० वर्ल्डकप जिंकला.


२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी - भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवत सातवा आयसीसीचा खिताब मिळवला.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)