Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली

  66

दुबई : टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल सामना खेळवला जात होता. क्रिकेट विश्वात अशी चर्चा आहे की हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्माचा शेवटचा वनडे सामना ठरू शकतो. ज्याप्रकारे टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.



मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीचे म्हणणे की, पुढील आयसीसी टूर्नामेंट येईपर्यंत रोहित निवृत्ती घेणार आणि आणि भारताकडून खेळेल. म्हणजेच गांगुलीचे म्हणणे आहे की रोहित शर्मा २०२७ वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळू शकतो. गांगुली म्हणाला की, त्याने काही महिन्यांपूर्वीच वर्ल्ड कप जिंकला आहे. मला माहित नाही की सिलेक्टर्स काय विचार करतात, पण रोहित खूप चांगले खेळत आहे. भारताचा न्यूझीलंडपेक्षा खूप चांगला खेळ आहे. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुद्धा सर्व सामने जिंकत आला असल्याने, तेव्हा हीच टीम खेळणार आहे'. असे गांगुली म्हणाला.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल