Mumbai News : गृहिणींना दिलासा ! डाळी, कडधान्य दरात घसरण

मुंबई : वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी, कडधान्यांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. एपीएमसीत चणाडाळ १२ टक्के तर तूरडाळ ५ टक्के आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव १४ टक्क्यांनी उतरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.गेल्या काही वर्षांपासून कमी पाऊस पडल्याने त्याचा कडधान्य उत्पादनावर परिणाम होऊन डाळीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. किरकोळ बाजारात तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांनी २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे महिलांना इतरत्र पर्याय उपलब्ध करून घ्यावे लागले होते. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने डाळींना अच्छे दिन आले आहेत.



एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. कर्नाटकातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला असून, यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूरडाळीच्या भावात प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरण झाली आहे. गृहिणींच्या नित्याच्या वापरात तूर, मसूर, मूग, चणाडाळ असतेच. त्यामुळे महागाई होऊनदेखील या डाळींची मागणी तेवढ्याच प्रमाणात होती; मात्र यंदा जास्त उत्पादन झाल्याने गृहिणींना आखडता हात घेण्याची वेळ येणार नसल्याचे समोर येत आहे. विशेषतः यावर्षी बाजारात हरभरा, तूर आणि हिरवा वाटाणा यांची अधिक आवक होण्यास सुरुवात झाली असून, अधिक आवक वाढून भाव आवाक्यात येतील, अशी शक्यता व्यापारीवर्गातून होत आहे.


किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १६० ते २०० रुपये; तर हिरवा वाटाणा २५० रुपयांनी विक्री होत होता. आता नवीन उत्पादन आल्याने तूरडाळ ११० ते १२० रुपये तर हिरवा वाटाणा १२० रुपयांवर उतरला आहे.

Comments
Add Comment

Mumbai Police Viral Video : आंदोलक विद्यार्थिनीशी पोलिसांकडून गैरवर्तन नाही!

- व्हायरल व्हिडिओवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण मुंबई : मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान साध्या वेशातील

Security tightened : राज्यातील संवेदनशील ठिकाणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची शक्यता आणि आगामी राजकीय मोर्चे लक्षात घेता महाराष्ट्र

Childhood Cancer : बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी मिळणार आर्थिक सहाय्य

- त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत

BMC : मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच; चार तलाव ओसंडून वाहत असतानाही बीएमसीची १०% पाणी कपात कायम

मुंबई: मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार महत्त्वाचे तलाव पूर्णपणे भरले

BMC Canteen : महापालिका मुख्यालयातील उपहारगृह त्वरीत बंद करण्याची एफडीएचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Juhu Beach : जुहू चौपाटीवरील कचरा उचलण्यास विलंब का झाला? संबंधित अधिकाऱ्यांवर करा कारवाई

मागील दहा वर्षातील कंत्राट कामाची चौकशी करा स्थायी समिती सदस्यांची मागणी मुंबई : मागील पावसाळ्यात विविध नाले