Mumbai News : गृहिणींना दिलासा ! डाळी, कडधान्य दरात घसरण

  54

मुंबई : वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी, कडधान्यांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. एपीएमसीत चणाडाळ १२ टक्के तर तूरडाळ ५ टक्के आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव १४ टक्क्यांनी उतरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.गेल्या काही वर्षांपासून कमी पाऊस पडल्याने त्याचा कडधान्य उत्पादनावर परिणाम होऊन डाळीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. किरकोळ बाजारात तूरडाळ, चणाडाळ आणि उडीद डाळ यांनी २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे महिलांना इतरत्र पर्याय उपलब्ध करून घ्यावे लागले होते. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने डाळींना अच्छे दिन आले आहेत.



एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात. कर्नाटकातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला असून, यंदा कर्नाटकात तूरडाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तूरडाळीच्या भावात प्रतिकिलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरण झाली आहे. गृहिणींच्या नित्याच्या वापरात तूर, मसूर, मूग, चणाडाळ असतेच. त्यामुळे महागाई होऊनदेखील या डाळींची मागणी तेवढ्याच प्रमाणात होती; मात्र यंदा जास्त उत्पादन झाल्याने गृहिणींना आखडता हात घेण्याची वेळ येणार नसल्याचे समोर येत आहे. विशेषतः यावर्षी बाजारात हरभरा, तूर आणि हिरवा वाटाणा यांची अधिक आवक होण्यास सुरुवात झाली असून, अधिक आवक वाढून भाव आवाक्यात येतील, अशी शक्यता व्यापारीवर्गातून होत आहे.


किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १६० ते २०० रुपये; तर हिरवा वाटाणा २५० रुपयांनी विक्री होत होता. आता नवीन उत्पादन आल्याने तूरडाळ ११० ते १२० रुपये तर हिरवा वाटाणा १२० रुपयांवर उतरला आहे.

Comments
Add Comment

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०

Devendra Fadanvis : "आता कोर्टाच्या आदेशांचं प्रशासन पालन करेल" – CM फडणवीसांचा ठाम इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज मुंबई