Mumbai Trees : मुंबईतील झाडांची वेदनांमधून अखेर झाली मुक्ती

मुंबई : मुंबईत महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी महापालिकेच्या दोन महिलांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील दोन उद्यान विद्या सहायकांनी चक्क झाडांना वेदनांमधून मुक्त केले. बोरीवलीतील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५०हून अधिक वृक्षांना ठोकलेले खिळे काढून या उद्यान विद्या सहायकांनी या वृक्षांना कायमच्याच वेदनांमधून मुक्त केले असून या दिवसापासून हाती घेतलेली ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या वतीने महिला दिनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिला दिनानिमित्त महिला दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या उद्यान विभागातील पुनम पास्टे, सुप्रिया सावंत या दोन्ही उद्यान विद्या सहायकांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. यासाठी या महिला अधिकाऱ्यांनी बोरिवली पश्चिम येथील चंदावरकर मार्गावरील तब्बल ५० हून अधिक झाडांना ठोकलेले खिळे स्वत: पुढाकार घेवून काढले. त्यांनी तब्बल १५० ते २०० खिळे काढले आहेत.


या रस्त्यावरील झाडांसह इतर झाडांना फलक तथा बोर्ड लावले जातात. यासाठी खिळे मारले जातात तसेच तारा बांधण्यासाठीही खिळे ठोकले जातात; परंतु हे बोर्ड किंवा तारा काढताना खिळे मात्र तसेच ठेवले जातात. परिणामी हे खिळे गंजून झाडांना धोका पोहोचतो. त्यामुळे हे खिळे काढणे खूप आवश्यक असतात. या खिळ्यांमुळे एकप्रकारे वृक्षांना यातना होत असतात आणि हेच खिळे काढून एकप्रकारे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी या वृक्षांना वेदनांतून मुक्ती दिली आहे.

Comments
Add Comment

गर्दी नियमनासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार — सीएसटी, ठाणे, कल्याणसह ६ स्थानकांवर तात्पुरती बंदी

रायगड : दिवाळी आणि छठ पूजेसारख्या मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची प्रचंड

अरे चाललंय काय? आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवण्यासाठी मोहीम!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रस्तावित विकास आराखड्या विरोधात 'SGNP वाचवा' मोहीम नागरिक आणि आदिवासी

दिवाळीच्या सुट्टीत राणीबागेत करा मज्जा.. महापालिकेने बच्चे मंडळींसाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा,

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता करावी - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असून, सर्वोच्च

मुंबई-ठाण्यात पावसामुळे नागरिकांची तारांबळ; दिवाळीच्या खरेदीला मोठा फटका!

हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' खरा ठरला; पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई/ठाणे: पाऊस परत आला! हवामान

Rain : यंदाच्या दिवाळीत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने