Holi Special Kokan Bus : खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांची होळी आधीच बोंबाबोंब

मुंबई : काही दिवसांवर होळी आली असून कोकणातील चाकरमान्यांना गावी जायचे वेध लागले आहेत. कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.(Holi Special Kokan) गावोगावी पालख्या नाचवल्या जातात, होळी दहन केली जाते, शंकासुर येतो, पुरणपोळीचा बेत आखला जातो. जणू कोकणातल्या प्रत्येक घरात देवाचं आगमन होत. याचं देवाच्या आगमनाला चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होतात. मात्र यावर्षी खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते रत्नागिरीदरम्यान ४०० ते ६०० रुपये असलेला खासगी बसचा दर सध्या ६०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचे भाडेदर १,५०० रुपयांपासून आहेत. एसटी गाड्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामुळे अधिकचे भाडे भरून खासगी बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पसंती आहे. असे असले तरी खासगी बसला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटी गाड्यांच्या तुलनेत खासगी वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांची स्थिती चांगली असते. सणासुदीच्या हंगामातच आणि एसटी भाडेदराच्या दीडपटीपर्यंतच खासगी बस चालक-मालकांकडून वाढीव दर आकारण्यात येतात. दरम्यान, ऑनलाइन बस आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात १० ते १५ टक्के सवलत मिळत आहे. या उदभवलेल्या प्रश्नांवर सरकार काय निर्णय घेणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहेत.(Holi Special Kokan)

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक