Holi Special Kokan Bus : खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांची होळी आधीच बोंबाबोंब

  67

मुंबई : काही दिवसांवर होळी आली असून कोकणातील चाकरमान्यांना गावी जायचे वेध लागले आहेत. कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.(Holi Special Kokan) गावोगावी पालख्या नाचवल्या जातात, होळी दहन केली जाते, शंकासुर येतो, पुरणपोळीचा बेत आखला जातो. जणू कोकणातल्या प्रत्येक घरात देवाचं आगमन होत. याचं देवाच्या आगमनाला चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होतात. मात्र यावर्षी खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते रत्नागिरीदरम्यान ४०० ते ६०० रुपये असलेला खासगी बसचा दर सध्या ६०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचे भाडेदर १,५०० रुपयांपासून आहेत. एसटी गाड्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामुळे अधिकचे भाडे भरून खासगी बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पसंती आहे. असे असले तरी खासगी बसला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटी गाड्यांच्या तुलनेत खासगी वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांची स्थिती चांगली असते. सणासुदीच्या हंगामातच आणि एसटी भाडेदराच्या दीडपटीपर्यंतच खासगी बस चालक-मालकांकडून वाढीव दर आकारण्यात येतात. दरम्यान, ऑनलाइन बस आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात १० ते १५ टक्के सवलत मिळत आहे. या उदभवलेल्या प्रश्नांवर सरकार काय निर्णय घेणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहेत.(Holi Special Kokan)

Comments
Add Comment

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या