महामुंबईतील ग्रोथ हबमुळे नवी मुंबई, खारघर आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार - गणेश नाईक

  61

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची विकासाची गती वाढविणारा आहे. अर्थसंकल्पात ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग आणि नवी मुंबई व खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापर केंद्रे निर्माण करण्याची घोषणेमुळे नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली.

राज्याच्या अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांवर भर, शेती क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या तरतुदीमुळे राज्याचा विकासाची गती आणखी वेगाने वाढणार आहे. महामुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब करण्याच्या घोषणेचा फायदा नवी मुंबई व खारघरला होणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर आणि त्याच्या जवळील प्रस्तावित तिसऱ्या विमानतळामुळे व समृद्धी महामार्गाला जोडले जाणार असल्यामुळे पालघर परिसराचा विकास गतीने होणार आहे. पायाभूत सुविधांवर भर दिल्यामुळे राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास वने मंत्री श्री. नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.

लाडकी बहिण योजना, लखपती दिदी योजनामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतूदीमुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व सामाजिक न्यायाचे तत्व पाळणारा असल्याचेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या