Satellite : आसाम राज्याला पहिल्यांदाच मिळणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरू

दिसपुर : देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा स्वतःचा उपग्रह (satellite) असेल. आसाम लवकरच असे करणारे देशातील पहिले राज्य बनणार आहे. आसाम सरकारने सोमवारी घोषणा केली की त्यांचा स्वतःचा उपग्रह असेल, जो महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्याबरोबरच सीमांवर देखरेख करण्यास मदत करेल.


आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नंतर दावा केला की आसाम हे स्वतःचे उपग्रह (satellite) असलेले देशातील पहिले राज्य असेल.



"भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) च्या सहकार्याने, आम्ही महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटाचा सतत, विश्वासार्ह प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आमचा स्वतःचा उपग्रह 'असमसॅट' स्थापित करण्याचा मानस करत असल्याचे त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.


नंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "जर आपल्याकडे स्वतःचा उपग्रह असेल तर तो आपल्याला कोणत्याही परदेशी व्यक्तीविषयी माहिती मिळू शकते. अथवा बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे का याची माहीतीही मिळू शकते. पुराची आगाऊ माहिती देऊ शकेल, हवामान अहवालात मदत करू शकेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत