Gudi Padwa Special : गुढीपाडव्याच्या तोंडावर साखरगाठी महागल्या

अमरावती : दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर साखरगाठी बनविल्या जातात. सध्या परतवाडा येथे जोरात गाठ्या बनवण्यास वेग आल्याचे दिसते. वाढत्या महागाईमुळे याच साखरगाठीच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे. साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखरगाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.


ऐन होळी, गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका साखर गाठीहार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना देखील बसला दरवाढीनी गाठीची मोडी ठरविली आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट-तीप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरातमधून आलेल्या साखरगाठीचाही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. होळीला अर्पण करुन लहान मुलांना रंगपंचमीच्छा दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे. मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आता काही दिवसांवर आलाय. घरोघरी त्याची तयारी सुरू झाली.



गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचं महत्त्व आहे. विशेषतः घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून देण्यात येतो. त्याचबरोबर देवाला आणि गुढीलाही ही साखरगाठी अर्पण केली जाते. या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधुला गाठी व साडीचोळी देण्याची प्रथा पुर्वीपासुन आज ही चालु आहे. त्यामुळे गाठीचे अधिक महत्व असले तरी महगाईने मात्र नागरीकांना हैराण केले आहे. त्यामुळे या होळीत आणि पुढीपाडव्याला याचा आर्थिक फटका नागरीकांना सहन करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना