Mumbai Update : मुंबईत आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

  44

मुंबई : मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढलेले तापमान व वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास मुंबईकरांना होत आहे. दरम्यान, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग तीन दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



उन्हाचा ताप, तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सकाळी वातावरणात जाणवणारा गारवा, दुपारी होणारी लाही असा तापमानामधील विचित्र बदल मुंबईकर अनुभवत आहेत. वाढत्या तापमानाची ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवार, सोमवार, मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.


फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. आता रविवारपासून मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अवघ्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाट येत आहे. यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३७ ते ३८ अंशांदरम्यान असण्याचा आणि किमान तापमानही वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मार्च महिन्यात ऋतू बदलतो. या काळात दरवर्षी उष्णतेच्या कमी - जास्त तीव्रतेच्या लाटेची शक्यता असते. मुंबईमध्ये वर्षभरात सरासरी ३१ दिवस उष्णतेच्या लाटा येतात. फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान वेगवेगळ्या दिवशी या लाटा येतात. यामुळे उष्णतेची लाट येणे ही सामान्य बाब आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शक्यतो सकाळी ते संध्याकाळी चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. बाहेर पडायचेच असेल तर अंगभर कपडे अथवा मोजे, हातमोजे, गॉगल, टोपी किंवा छत्री, चेहऱ्याला उन्हाच्या झळा लागू नये म्हणून गमछा किंवा ओढणी (दुपट्टा) अथवा स्कार्फ वापरा. शक्यतो पांढऱ्या रंगाचे सैल सुती कपडे वापरा. काळ्या रंगाचे किंवा कोणतेही गडद रंगांचे (डार्क कलर) कपडे वापरणे टाळा. बाहेर पडताना सोबत पिण्यासाठी अर्धा ते एक लिटर पाणी बाळगा. दिवसभरात अधूनमधून पाणी, नारळपाणी, ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत पिऊन शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवा. तब्येत बिघडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही