Solapur Crime : सोलापूरात १२ बांगलादेशी तरुणांकडे बनावट कागदपत्रे

  32

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीत राहायला असलेल्या १२ बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका ठेकेदारामार्फत आसाममार्गे ते भारतात आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याकडे तमिळनाडू, त्रिपुरा व पश्चिम बंगाल येथील आधारकार्ड व पॅनकार्ड आढळली आहेत. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्यांच्या चौकशीसाठी सोलापूर शहर पोलिसांची पथके त्याठिकाणी जाणार आहेत.


सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील दोन वेगवेगळ्या उद्योगात कामाला असलेल्या १२ बांगलादेशी तरुणांना एमआयडीसी पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करीत आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनीही या बाबीला गांभीर्याने घेतले आहे.



आधारकार्डसाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे कोणी मिळवून दिली, आसाममार्गे त्यांना भारतात घेऊन येणारा तो ठेकेदार कोण आणि १२ बांगलादेशी सोलापुरात कोणाच्या मदतीने आले, त्यांच्या ओळखीचे अन्य बांगलादेशी तरुण सोलापूर जिल्ह्यात कोठे आहेत का? या बाबींचा कसून तपास सुरू आहे. पुढील दोन दिवसांत तपासात बऱ्याच बाबी स्पष्ट होतील, असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत