तिकीट कन्फर्म असणाऱ्यांनाच मिळणार प्लॅटफॉर्मवर प्रवेश

देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नवीन नियम लागू


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर (प्लॅटफॉर्मवर) प्रवेश दिला जाणार आहे. देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नवीन नियम लागू केला जाईल. या नियमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देखील भारतीय रेल्वेने म्हटले आहे.


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये जास्त पादचाऱ्यांची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली. बैठकीत जास्त रेल्वे प्रवासींची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली. या नवीन धोरणाचे उद्दिष्ट विशेषतः गर्दीच्या हंगामात प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात आणणे हा आहे.



विशेषतः सुट्ट्या आणि सणांच्या काळात भारतीय रेल्वे स्थानकांवर सहसा गर्दी असते. बरेच लोक त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येतात आणि यामुळे गर्दी वाढते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी रोखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे धोरण लवकरच लागू केले जाईल. देशातील मोठ्या शहरांमधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर लवकरच हे धोरण लागू केले होईल. या नवीन नियमांमुळे अनपेक्षित गर्दी टाळता येईल आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल, असे भारतीय रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.


देशातील ६० मोठ्या रेल्वे स्थानकांवर हा नियम लागू केला जाईल. गर्दी नियंत्रणाच्या गरजेनुसार अतिरिक्त स्थानके यादीत समाविष्ट केली जातील, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.



‘या’ स्थानकांचा समावेश


नवी दिल्ली रेल्वे स्थानक (दिल्ली)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
हावडा जंक्शन (कोलकाता)
चेन्नई सेंट्रल (चेन्नई)
बंगळुरू सिटी रेल्वे स्थानक (बंगळुरू )

Comments
Add Comment

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी