Devendra Fadnavis : ‘तो’ कॉल ठाकरेंनी घेतला असता, तर २ पक्ष फुटले नसते

  72

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोजक्या शब्दांमध्ये सूचक उत्तर


मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि भाजप यांची जवळीक वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कोल्डवॉर सुरु असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील अंतर कमी होऊ लागलं आहे. त्यातच एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत सूचक उत्तर दिले.


उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणीची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. पाच वर्षांमधील अनुभवातून मी एक गोष्ट नक्की शिकलो. एखाद्या गोष्टीला नाही म्हटले म्हणजे ती गोष्ट नाहीच होणार असे नाही, अशी पुस्तीही फडणवीसांनी पुढे जोडली. मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत माझे संबंध कधीच वाईट नव्हते, असे फडणवीस म्हणाले.


‘महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधकांना शत्रू समजले जात होते. पण मी पुन्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट केली होती. मी इथे बदल घडवण्यासाठी आलो आहे, बदला घेण्यासाठी आलेलो नाही. मला संवाद कायम ठेवायचा आहे. माझे लक्ष विकासावर आहे. विरोधकांसोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो,’ असे फडणवीसांनी सांगितले.


उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा फोन घेतला असता, कॉल उचलला असता, तर दोन पक्षांमध्ये फूट पडलीच नसती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ‘ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता, तर आताची परिस्थितीच वेगळी असती. पण आता आम्ही एकमेकांचे फोन घेतो,' असं सांगत फडणवीसांनी ठाकरेंसोबत आता त्यांचे संबंध सुधारले असल्याचे सूचक संकेत दिले.


शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. पण राजकारणात काहीही घडू शकते, असेही ते पुढे म्हणाले. ‘राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतो, हेच गेल्या ५ वर्षांत मी शिकलो आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, मला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही,’ असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी अतिरिक्त आरक्षण खिडक्या

प्रवासी संघटनेने खा. नरेश म्हस्के यांचे मानले आभार ठाणे : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास

Weather Update: कसं असेल पुढील चार आठवडे राज्याचे हवामान? घ्या जाणून

मुंबई : हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांतील महाराष्ट्रामधील हवामानाचा विस्तृत अंदाज जाहीर केला आहे. हवामान

Mumbai train robbery: मुंबईत ट्रेनमध्ये लूटमारीचा थरार! पत्नीला वाचवताना डॉक्टरने हात गमावला!

मुंबई : मुंबईहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड एक्स्प्रेसमधील एक घटना बुधवारी पहाटे कांजुरमार्ग स्टेशनच्या

डिनो मोरियाच्या घरी ईडीची छापेमारी, मातोश्रीत टेन्शन, आदित्य अडकणार? उद्धव गटाचे धाबे दणाणले!

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास करताना आज ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: रेपो दराचा बाजारात बोलबाला सेन्सेक्स ७४६ व निफ्टी २५२ अंशाने वधारला

मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर दणदणीत झाली आहे. बाजार गिफ्ट निफ्टीच्या संकेतानंतर रूक्ष होईल का ही चिंता

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात