पालघर जिल्ह्यातील साडेचार लाख वाहनधारकांनी फिरवली पाठ

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी केवळ १४ हजार अर्ज


विरार : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र ही नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप अर्जच केले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिली जाते. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही.



त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.


यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतःदेखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे. दरम्यान, एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने पालघर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी ५ मार्चपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केलेले आहेत, तर ३ हजार ९०७ वाहनांना ह्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.


एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करून वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. - अतुल आदे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर
Comments
Add Comment

Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक'जवळ भीषण साखळी अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

लोणी काळभोर/बोरघाट: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि नुकत्याच सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'

Ramdara Mandir : रामदरा शिवालयाचे गर्भगृह नूतनीकरण; १८ जुलैपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद

लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि

Pandharpur Crime : धक्कादायक! रेल्वे रुळांजवळ मृतदेह, तुटलेला पाय घराच्या दरवाज्यात टांगलेला अवस्थेत

पंढरपूर पोलिसांसमोर गूढ वाढले पंढरपूर : धावत्या रेल्वेची धडक बसून 24 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू  (Railway Accident Death)

Jalgaon : आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, अमळनेर रेल्वे स्थानकात खळबळ

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रेल्वे स्थानकावर (Amalner Railway Station) सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे

Drinking Water Policy : ग्रामीण भागात शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी नवे धोरण; दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारणार

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य