पालघर जिल्ह्यातील साडेचार लाख वाहनधारकांनी फिरवली पाठ

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी केवळ १४ हजार अर्ज


विरार : एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये मात्र ही नंबर प्लेट बसविण्यासाठी निरुत्साहीपणा दिसून येत असून जिल्ह्यातील साडेचार लाखांहून अधिक वाहनधारकांनी अद्याप अर्जच केले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


वाहनांची चोरी, गैरवापर टाळण्यासोबतच अपघात झाल्यास संबंधित वाहन मालकाची सर्व माहिती सहजपणे मिळविण्यासाठी एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना अत्याधुनिक सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहेत. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वितरकाकडूनच ही नंबर प्लेट उपलब्ध करून दिली जाते. मात्र एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही.



त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर अत्याधुनिक हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यात येत आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिल २०२५ या तारखेपूर्वी अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन असलेली नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.


यासाठी सर्वच शहरांमध्ये अधिकृत केंद्र देखील उघडण्यात आलेले आहेत. तसेच वाहनधारकांना स्वतःदेखील ऑनलाईन प्रक्रिया करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मिळवता येणार आहे. दरम्यान, एप्रिल २०१९ पूर्वीची ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने पालघर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी केवळ १३ हजार ४६३ वाहनधारकांनी ५ मार्चपर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेटसाठी अर्ज केलेले आहेत, तर ३ हजार ९०७ वाहनांना ह्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. परिणामी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांना बसविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.


एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याबाबत आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यातील दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाहनधारकांनी अधिकृत केंद्रात नोंदणी करून वाहनांना नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. - अतुल आदे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पालघर
Comments
Add Comment

Kolhapur News : किळसवाणा प्रकार! हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर; खवय्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

कोल्हापूर : अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते, पण याच अन्नाच्या नावाने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ खेळणारा एक

FDA action in Jalgaon : छापील कागदांमध्ये वडापाव विकणे पडले महागात ! ‘एफडीए’ची कारवाई

FDA action in Jalgaon : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यात ‘एफडीए’ने कारवाई करत

Lohagad Fort : ऐतिहासिक लोहगडावर पर्यटकांचा धक्कादायक प्रकार; व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संताप

पुणे : लोहगड (Lohagad Fort) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या ऐतिहासिक किल्ल्याकडे

Road Accident : गुरुपौर्णिमेच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; २ ठार, २३ जण जखमी

धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Parth Pawar-Kainat Dhar : मान्यवरांच्या उपस्थितीत पार्थ पवार-कायनात दारा यांचा दिमाखदार साखरपुडा संपन्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा (Parth Pawar-Kainat Dhar) यांचा साखरपुडा गुरुवारी

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत; २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेचे मोठे यश

मुंबई : अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेला मुंबई-पुणे रेल्वे संपर्क अखेर पूर्णपणे पूर्ववत करण्यात मध्य रेल्वेला यश