मुंबईत पत्नीला वैतागून ४१ वर्षीय पतीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव निशांत त्रिपाठी असे आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या छळाला वैतागून निशांत त्रिपाठीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी निशांतने तो ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या वेबसाईटवर एक पत्र अपलोड केले. या पत्रात त्याने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. तसेच निशांतने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रातून, 'माझ्या आईपासून दूर राहा' अशी विनंती पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींना केली आहे.



निशांतने मुंबईतील हॉटेलची खोली बुक केली होती. याच खोलीतून त्याने कंपनीच्या वेबसाईटवर आत्महत्येचे कारण नमूद केलेले पत्र अपलोड केले. यानंतर खोलीतच त्याने गळफास घेतला. लवकर कोणाला कळू नये यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतानाच त्याने दरवाजावर 'डू नॉट डिस्टर्ब' अशी पाटी लावली होती.



हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.

हॉटेलच्या विशिष्ट खोलीतून अनेक तासांपासून कोणी बाहेर आलेले नाही आणि तिथून एकही ऑर्डर आलेली नाही हे बघून व्यवस्थापनाने स्वतःकडे असलेल्या चावीचा वापर करुन खोलीत प्रवेश केला. खोलीत शिरताच हॉटेलच्या कर्मचाऱ्याला निशांत बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता