मुंबईत पत्नीला वैतागून ४१ वर्षीय पतीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव निशांत त्रिपाठी असे आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या छळाला वैतागून निशांत त्रिपाठीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी निशांतने तो ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या वेबसाईटवर एक पत्र अपलोड केले. या पत्रात त्याने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. तसेच निशांतने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रातून, 'माझ्या आईपासून दूर राहा' अशी विनंती पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींना केली आहे.



निशांतने मुंबईतील हॉटेलची खोली बुक केली होती. याच खोलीतून त्याने कंपनीच्या वेबसाईटवर आत्महत्येचे कारण नमूद केलेले पत्र अपलोड केले. यानंतर खोलीतच त्याने गळफास घेतला. लवकर कोणाला कळू नये यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतानाच त्याने दरवाजावर 'डू नॉट डिस्टर्ब' अशी पाटी लावली होती.



हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.

हॉटेलच्या विशिष्ट खोलीतून अनेक तासांपासून कोणी बाहेर आलेले नाही आणि तिथून एकही ऑर्डर आलेली नाही हे बघून व्यवस्थापनाने स्वतःकडे असलेल्या चावीचा वापर करुन खोलीत प्रवेश केला. खोलीत शिरताच हॉटेलच्या कर्मचाऱ्याला निशांत बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
Comments
Add Comment

‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या