मुंबईत पत्नीला वैतागून ४१ वर्षीय पतीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव निशांत त्रिपाठी असे आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या छळाला वैतागून निशांत त्रिपाठीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी निशांतने तो ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या वेबसाईटवर एक पत्र अपलोड केले. या पत्रात त्याने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. तसेच निशांतने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रातून, 'माझ्या आईपासून दूर राहा' अशी विनंती पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींना केली आहे.



निशांतने मुंबईतील हॉटेलची खोली बुक केली होती. याच खोलीतून त्याने कंपनीच्या वेबसाईटवर आत्महत्येचे कारण नमूद केलेले पत्र अपलोड केले. यानंतर खोलीतच त्याने गळफास घेतला. लवकर कोणाला कळू नये यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतानाच त्याने दरवाजावर 'डू नॉट डिस्टर्ब' अशी पाटी लावली होती.



हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.

हॉटेलच्या विशिष्ट खोलीतून अनेक तासांपासून कोणी बाहेर आलेले नाही आणि तिथून एकही ऑर्डर आलेली नाही हे बघून व्यवस्थापनाने स्वतःकडे असलेल्या चावीचा वापर करुन खोलीत प्रवेश केला. खोलीत शिरताच हॉटेलच्या कर्मचाऱ्याला निशांत बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल