मुंबईत पत्नीला वैतागून ४१ वर्षीय पतीची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे नाव निशांत त्रिपाठी असे आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या छळाला वैतागून निशांत त्रिपाठीने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्याआधी निशांतने तो ज्या कंपनीत नोकरी करत होता त्या कंपनीच्या वेबसाईटवर एक पत्र अपलोड केले. या पत्रात त्याने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. तसेच निशांतने आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या पत्रातून, 'माझ्या आईपासून दूर राहा' अशी विनंती पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींना केली आहे.



निशांतने मुंबईतील हॉटेलची खोली बुक केली होती. याच खोलीतून त्याने कंपनीच्या वेबसाईटवर आत्महत्येचे कारण नमूद केलेले पत्र अपलोड केले. यानंतर खोलीतच त्याने गळफास घेतला. लवकर कोणाला कळू नये यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करतानाच त्याने दरवाजावर 'डू नॉट डिस्टर्ब' अशी पाटी लावली होती.



हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिख त्रिपाठी आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे.

हॉटेलच्या विशिष्ट खोलीतून अनेक तासांपासून कोणी बाहेर आलेले नाही आणि तिथून एकही ऑर्डर आलेली नाही हे बघून व्यवस्थापनाने स्वतःकडे असलेल्या चावीचा वापर करुन खोलीत प्रवेश केला. खोलीत शिरताच हॉटेलच्या कर्मचाऱ्याला निशांत बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या