Satara : आईच्या आग्रहाने वाचले मुलाचे प्राण!

सातारा : प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे. यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. मात्र तरीही अनेक तरुण हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना साताऱ्यात घडली आहे.



साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील सूरज जाधव (२४) हा तरुण त्याचा मित्र पिंटू ऊर्फ राजेश रिदि (२४) यासह दुचाकीवरुन पुण्याला निघाला होता. मात्र यावेळी तो हेल्मेट न घालता घराबाहेर पडला. हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला मुलान हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होत. 'हेल्मेट घालूनच गाडी चालव' असा आग्रह देखील सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन निघली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.


सूरजने घरातून निघताना 'आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस? असं तो म्हणाला. मात्र काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि आणि पोहोचल्यानंतर फोन कर. असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला. परंतु अवघ्या दिड तासात आईचा फोन खणखणला. तुमच्या मुलाचा अपघात झाला. दोघांनाही पुण्याला हलवलंय. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजाऱ्यांन सोबत ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन वाजला. यावेळी ''आई, मी सूरज बोलतोय, आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे माला काहीही झालं नाही. परंतु पिंटूने हेल्मेट न घातल्यामुळे तो कोमा गेला आहे''. सूरजने असे सांगताच आईच्या जीवात जीव आला.


त्यानंतर सूरजची आई पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मात्र, सूरजचा मित्र राजेश या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या आईच्या एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसू अशी अवस्था निर्माण झाली होती.

Comments
Add Comment

Food Adulteration : फळे आणि भाज्यांमध्ये घातक रसायनांचा वापर करणारे रडारवर

- दोषींचे परवाने रद्द होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या

Maharashtra FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता

'Corporate Jihad' : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, २५ हून अधिक शिफारसी

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला

Maharashtra Rain Alert : ऐन उन्हाळ्यात 'या' दिवशी राज्यात जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र आहे. एकाबाजूला हैराण करून सोडणारा उकाडा तर दुसऱ्या बाजूला मुसळधार

Riteish and Genelia visit Kolhapur : 'राजा शिवाजी'च्या घवघवीत यशानंतर रितेश-जेनेलिया कोल्हापुरात; श्री अंबाबाईचे घेतले दर्शन!

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shhivaji Movie) या ऐतिहासिक चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

Minister Sanjay Shirsat : नाशिकमधील 'टीसीएस'प्रकरण म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचे रॅकेट, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा

मुंबई : "नाशिकच्या 'टीसीएस' कंपनीतील धर्मांतर प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद