सोन्याच्या तस्करीत आयपीएसची मुलगी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हात

बंगळुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले.



रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. घरामधून एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. यानंतर रान्याला चौकशीसाठी डीआरआयचे पथक नागवारा येथील कार्यालयात घेऊन गेले. डीआरआयच्या हाती आलेल्या माहितीनुसार रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत असल्याचे कळले तेव्हा कारवाई करण्याचा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील काही काळापासून रान्याच्या हालचालींवर डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी ती केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर पोलिसाच्या मदतीने तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडत होती. यामुळे रान्याने आतापर्यंत किती कोटी रुपयांची तस्करी केली आणि फक्त सोन्याची तस्करी केली आणि इतर वस्तूंचीही तस्करी केली याचा तपास सुरू आहे.



रान्याच्या तस्करीचा संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा आहे. नेत्याच्या सूचनांनुसार सोन्याची तस्करी सुरू होती, असे समजते. या प्रकरणी संबंधित नेत्याचीही लवकरच डीआरआय चौकशी करण्याची शक्यता आहे.



सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपात रान्याला पकडण्यात आले. पण रान्याने वेगळाच दावा केला. मला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले; असे रान्याने सांगितले. रान्याचे वडील आणि कर्नाटक पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांनी माहिती मिळताच धक्का बसला, अशी प्रतिक्रिया दिली. रान्याचे लग्न झाले आहे आणि मागील अनेक दिवसांपासून ती आमच्यासोबत नाही त्यामुळे तिनं नेमकं काय केलंय आणि का केलंय या विषयावर मला बोलता येणार नाही; असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी