सोन्याच्या तस्करीत आयपीएसची मुलगी असलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीचा हात

बंगळुरू : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले.



रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. घरामधून एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. यानंतर रान्याला चौकशीसाठी डीआरआयचे पथक नागवारा येथील कार्यालयात घेऊन गेले. डीआरआयच्या हाती आलेल्या माहितीनुसार रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत असल्याचे कळले तेव्हा कारवाई करण्याचा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील काही काळापासून रान्याच्या हालचालींवर डीआरआयचे अधिकारी लक्ष ठेवून होते. प्रत्येकवेळी ती केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर पोलिसाच्या मदतीने तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडत होती. यामुळे रान्याने आतापर्यंत किती कोटी रुपयांची तस्करी केली आणि फक्त सोन्याची तस्करी केली आणि इतर वस्तूंचीही तस्करी केली याचा तपास सुरू आहे.



रान्याच्या तस्करीचा संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्याची चर्चा आहे. नेत्याच्या सूचनांनुसार सोन्याची तस्करी सुरू होती, असे समजते. या प्रकरणी संबंधित नेत्याचीही लवकरच डीआरआय चौकशी करण्याची शक्यता आहे.



सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपात रान्याला पकडण्यात आले. पण रान्याने वेगळाच दावा केला. मला सोन्याची तस्करी करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आले; असे रान्याने सांगितले. रान्याचे वडील आणि कर्नाटक पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे महासंचालक डीजीपी रामचंद्र राव यांनी माहिती मिळताच धक्का बसला, अशी प्रतिक्रिया दिली. रान्याचे लग्न झाले आहे आणि मागील अनेक दिवसांपासून ती आमच्यासोबत नाही त्यामुळे तिनं नेमकं काय केलंय आणि का केलंय या विषयावर मला बोलता येणार नाही; असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या