FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे... या आहेत ५ स्कीम ज्यात मिळत आहे जबरदस्त व्याज

मुंबई: शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे असे मार्ग निवडले आहेत ज्यात जोखीम नसते. सुरक्षित गुंतवणूक आणि रिटर्न्सच्या बाबतीत फिक्स डिपॉझिट स्कीम्स खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्ही तुम्हाला अशा एफडीबद्दल सांगणार आहोत ज्यात शानदार व्याज मिळत आहे.


खास बाब म्हणजे या स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तसेच त्यांचा फायदा घेण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एसबीआय बँकची अमृत वृष्टी आहे. यात ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के दिले जात आहे.


दुसऱ्या ४०० दिवसांच्या गुंतवणुकीची अमृत कलश योजना आहे. यात सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळत आहे.


IDBI बँकची स्पेशल उत्सव कॉलबेल एफडी ३०० दिवसांची आहे. यात सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज ऑफर करत आहे.


चौथ्या नंबरवर आयडीबीआय बँक ची ही स्कीम आहे. ही ७०० दिवसांची आहे आणि यात सामान्य नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना व्याज अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे.


इंडियन बँकेची सुप्रीम ३०० दिवसांची एफडी स्कीम आहे. याची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत आहे. यात वरिष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य