FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे... या आहेत ५ स्कीम ज्यात मिळत आहे जबरदस्त व्याज

मुंबई: शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे असे मार्ग निवडले आहेत ज्यात जोखीम नसते. सुरक्षित गुंतवणूक आणि रिटर्न्सच्या बाबतीत फिक्स डिपॉझिट स्कीम्स खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्ही तुम्हाला अशा एफडीबद्दल सांगणार आहोत ज्यात शानदार व्याज मिळत आहे.


खास बाब म्हणजे या स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तसेच त्यांचा फायदा घेण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एसबीआय बँकची अमृत वृष्टी आहे. यात ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के दिले जात आहे.


दुसऱ्या ४०० दिवसांच्या गुंतवणुकीची अमृत कलश योजना आहे. यात सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळत आहे.


IDBI बँकची स्पेशल उत्सव कॉलबेल एफडी ३०० दिवसांची आहे. यात सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज ऑफर करत आहे.


चौथ्या नंबरवर आयडीबीआय बँक ची ही स्कीम आहे. ही ७०० दिवसांची आहे आणि यात सामान्य नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना व्याज अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे.


इंडियन बँकेची सुप्रीम ३०० दिवसांची एफडी स्कीम आहे. याची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत आहे. यात वरिष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.