FDमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे... या आहेत ५ स्कीम ज्यात मिळत आहे जबरदस्त व्याज

मुंबई: शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे असे मार्ग निवडले आहेत ज्यात जोखीम नसते. सुरक्षित गुंतवणूक आणि रिटर्न्सच्या बाबतीत फिक्स डिपॉझिट स्कीम्स खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्ही तुम्हाला अशा एफडीबद्दल सांगणार आहोत ज्यात शानदार व्याज मिळत आहे.


खास बाब म्हणजे या स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तसेच त्यांचा फायदा घेण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एसबीआय बँकची अमृत वृष्टी आहे. यात ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के दिले जात आहे.


दुसऱ्या ४०० दिवसांच्या गुंतवणुकीची अमृत कलश योजना आहे. यात सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळत आहे.


IDBI बँकची स्पेशल उत्सव कॉलबेल एफडी ३०० दिवसांची आहे. यात सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज ऑफर करत आहे.


चौथ्या नंबरवर आयडीबीआय बँक ची ही स्कीम आहे. ही ७०० दिवसांची आहे आणि यात सामान्य नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना व्याज अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे.


इंडियन बँकेची सुप्रीम ३०० दिवसांची एफडी स्कीम आहे. याची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत आहे. यात वरिष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम