Hapus : हवामान बदलाचा हापूस आंब्याला फटका!

आवक घटल्याने खवय्यांच्या खिशाला बसणार झळ


नवी मुंबई : एप्रिल महिन्याची चाहूल लागताच महाराष्ट्रातील प्रत्येक जण वाट पाहतो ती हापूस आंब्यांची (Hapus Mango). हापूस आंबा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचे फळ आहे. मात्र यंदा हापसू आंब्यांची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त हापूस (Hapus) खाता येणार नसल्याची चिन्हे आहेत. एपीएमसी बाजारात यावर्षी हापूस हंगाम (Mango Season) सुरळीत राहील अशी अपेक्षा होती; परंतु ऐन फळधारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.



पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने हापूस आंब्यांवर (Hapus Mango) परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. यंदा ३५ ते ४० टक्के उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू झाली होती, तर मार्चमध्ये हंगाम सुरू झाला होता, मार्चमध्ये ४० ते ५० हजार पेट्या दाखल होत होत्या. यावेळी मात्र मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या आंब्यात घट होऊन कमी हापूस दाखल होत आहे. फेब्रुवारीमध्ये एक दिवस आड कोकणातील हापूसच्या (Hapus) पेट्या दखल होत होत्या, तर सध्या बाजारात आता तीन ते साडेतीन हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम अवघा ३५ ते ४० टक्के आहे. तसेच मे अखेरपर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे.



रत्नागिरी, देवगड, रायगडच्या हापूसची आवक


एरव्ही तीन ते चार महिने हंगाम सुरू असतो. यंदा मात्र २० मार्च ते एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक १० मेपर्यंत राहणार असल्याची माहिती एपीएमसीतील फळ मार्केटमधील एसएससी कंपनीचे घाऊक फळ व्यापारी नरेंद्र हांडेपाटील यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, देवगडचा, रायगडचा हापूस दाखल होत असून चार ते सहा डझनाच्या पेटीला तीन हजार ते सहा हजार रुपये दराने विक्री होत आहे. कोकणातून आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. प्रत्येक पेटीला साठेआठ हजार रुपये दर मिळत असल्याचे सनोर आले आहे. टप्प्याटप्याने हापूस आंब्याच्या पेट्या रवाना होऊ लागल्या आहेत. आंब्यांचे पीक कमी होत असल्याने आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Hapus)

Comments
Add Comment

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना