Kedarnath ला जाण्याचा प्लान करताय? ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत

  109

नवी दिल्ली: हिंदुंच्या पवित्र ४ धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. या रोप-वेचा मोठा फायदा होणार असून यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनीटात होईल. विशेष म्हणजे या रोप-वे कारमध्ये ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४ हजार ८१ कोटी रुपये असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.



दररोज १८ हजार प्रवाशांना घेऊन जाणार रोप वे


उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या या रोपवेची क्षमता १८०० प्रवासी प्रति तास असणार आहे. यामुळे दर दिवशी तब्बल १८ हजार प्रवासी रोप वेने प्रवास करू शकतात.



वर्षभर उपलब्ध होणार रोजगार


रोपवेमुळे हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, फूड तसेच पर्यटन यासारख्या उद्योगांना संपूर्ण वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे दळवळणाला अधिक प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या