Kedarnath ला जाण्याचा प्लान करताय? ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत

नवी दिल्ली: हिंदुंच्या पवित्र ४ धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. या रोप-वेचा मोठा फायदा होणार असून यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनीटात होईल. विशेष म्हणजे या रोप-वे कारमध्ये ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४ हजार ८१ कोटी रुपये असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.



दररोज १८ हजार प्रवाशांना घेऊन जाणार रोप वे


उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या या रोपवेची क्षमता १८०० प्रवासी प्रति तास असणार आहे. यामुळे दर दिवशी तब्बल १८ हजार प्रवासी रोप वेने प्रवास करू शकतात.



वर्षभर उपलब्ध होणार रोजगार


रोपवेमुळे हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, फूड तसेच पर्यटन यासारख्या उद्योगांना संपूर्ण वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे दळवळणाला अधिक प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार