Kedarnath ला जाण्याचा प्लान करताय? ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत

  105

नवी दिल्ली: हिंदुंच्या पवित्र ४ धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. या रोप-वेचा मोठा फायदा होणार असून यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनीटात होईल. विशेष म्हणजे या रोप-वे कारमध्ये ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४ हजार ८१ कोटी रुपये असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.



दररोज १८ हजार प्रवाशांना घेऊन जाणार रोप वे


उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या या रोपवेची क्षमता १८०० प्रवासी प्रति तास असणार आहे. यामुळे दर दिवशी तब्बल १८ हजार प्रवासी रोप वेने प्रवास करू शकतात.



वर्षभर उपलब्ध होणार रोजगार


रोपवेमुळे हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, फूड तसेच पर्यटन यासारख्या उद्योगांना संपूर्ण वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे दळवळणाला अधिक प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर