Kedarnath ला जाण्याचा प्लान करताय? ९ तासांचा प्रवास आता फक्त ३६ मिनिटांत

नवी दिल्ली: हिंदुंच्या पवित्र ४ धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. या रोप-वेचा मोठा फायदा होणार असून यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास ३६ मिनीटात होईल. विशेष म्हणजे या रोप-वे कारमध्ये ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च ४ हजार ८१ कोटी रुपये असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.



दररोज १८ हजार प्रवाशांना घेऊन जाणार रोप वे


उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या या रोपवेची क्षमता १८०० प्रवासी प्रति तास असणार आहे. यामुळे दर दिवशी तब्बल १८ हजार प्रवासी रोप वेने प्रवास करू शकतात.



वर्षभर उपलब्ध होणार रोजगार


रोपवेमुळे हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल, फूड तसेच पर्यटन यासारख्या उद्योगांना संपूर्ण वर्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे दळवळणाला अधिक प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन