झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती-पत्नीचं नाव

मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची नोंद केली जाणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात हा नियम झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू असेल.



झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नव्या नियमानुसार पुनर्विकासात मिळणारे घर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक आहे. संपत्तीत पती आणि पत्नी या दोघांचाही वाटा असल्याचे समजतात. याच पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी या दोघांचाही हक्क असेल.



घरावर पती आणि पत्नीचे हक्क असल्यास कायदेशीर अडचणी येत नाही. मात्र, काही प्रकरणात अशी नावांची नोंद नसल्यास पतीच्या निधनानंतर महिलेस कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची संयुक्त नोंद करण्याचा निर्णय झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-२ मध्ये यासाठी बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता घरांचे वितरण करताना घरांच्या वाटपपत्रावर पती-पत्नीवर दोघांची नावे नोंद करुन घरे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या

BMC : 'मुंबईत एकही गटाराचे झाकण उघडे राहता कामा नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत एकही मनुष्य प्रवेशिका अर्थात गटाराची झाकणे उघडी राहणार नाही, याची