झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती-पत्नीचं नाव

मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची नोंद केली जाणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात हा नियम झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू असेल.



झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नव्या नियमानुसार पुनर्विकासात मिळणारे घर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक आहे. संपत्तीत पती आणि पत्नी या दोघांचाही वाटा असल्याचे समजतात. याच पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी या दोघांचाही हक्क असेल.



घरावर पती आणि पत्नीचे हक्क असल्यास कायदेशीर अडचणी येत नाही. मात्र, काही प्रकरणात अशी नावांची नोंद नसल्यास पतीच्या निधनानंतर महिलेस कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची संयुक्त नोंद करण्याचा निर्णय झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-२ मध्ये यासाठी बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता घरांचे वितरण करताना घरांच्या वाटपपत्रावर पती-पत्नीवर दोघांची नावे नोंद करुन घरे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

अरुण गवळी कुटुंबाला धक्क्यावर धक्के

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रणागणांत कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या दोन मुलींसह वहिनीचा पराभव झाला

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या