पालघर : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक (TAIT २०२२) पात्र उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी जनता दरबारामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेला पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी पालघर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. पालघर जिल्हा प्रशासन स्थानिक उमेदवारांना सहकार्य करीत नसून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांना यावेळी लक्ष केले होते.
पालघर जिल्हा परिषदेकडून २८ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक प्रसारित करण्यात आले असून या मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षक पदभरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना तसेच TAIT २०२२ परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना त्यांचे समुपदेशन देऊन नियुक्ती देण्यात येऊ नये, त्या जागी स्थानिक TAIT २०२२ पात्र उमेदवारांना संधी देऊन नियुक्ती देण्यात यावी, असे म्हटले आहे.
२० फेब्रुवारी २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार येथे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनाचे निराकरण झाले नाही मात्र पालघर जिल्हा पालकमंत्री यांच्याकडून योग्य मार्गदर्शन सुचना येईपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करावी. अन्यथा आम्ही TAIT २०२२ पात्र उमेदवार पालघर यांच्याकडून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे पालघर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील.
जर आमच्या उमेदवारांमधील उष्माघाताने, भूकबळीने जीव गमवावा लागला तर त्यास सर्वस्वी जबाबदार पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी राहतील, असा इशारा कृष्णा बबन भोये, मगन रामता भोये, नवशा शंकर नारले यांच्यासह शेकडो बेरोजगार शिक्षकांनी दिला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…